शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सिडको प्रकल्प; नवीन सरकार- नवीन जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:08 IST

जालना शहरातील कामगार आणि गरीब मध्यमवर्गातील नागरिकांना औरंगाबादच्या धर्तीवर सिडको प्रकल्प उभारण्यासाठी आता आणखी वाट पाहावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील कामगार आणि गरीब मध्यमवर्गातील नागरिकांना औरंगाबादच्या धर्तीवर सिडको प्रकल्प उभारण्यासाठी आता आणखी वाट पाहावी लागणार आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह तत्कालीन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढकाराने हा प्रकल्प जालना तालुक्यातील खरपुडी येथे प्रस्तावित करण्यात आला होता. सिडकोने त्यासाठी जागाही संपादित केली होती. मात्र, येलो झोन आणि ग्रीन झोनच्या दर युध्दात हा प्रकल्प बारगळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प खरपूडी ऐवजी आता समृध्दी मार्गावरील एखाद्या गावात उभारण्याच्या हालचालींना गती आली आहे.जालना शहराचा विकास हा गेल्या वीस वर्षात चौफेर झाला आहे. त्यामुळे येथील औद्योगिक विकासामुळे हजारो कामगार आणि मध्यवर्ग स्थायिक झाला आहे. या वर्गातील नागरिकांना त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडतील अशी घरे मिळावीत यासाठी तत्कालीन आघाडी सरकार मधील नगरविकास मंत्री आ. राजेश टोपे यांनी प्रथम हा प्रकल्प जालन्यातील नागेवाडी आणि खादगाव शिवारात आणला होता. परंतु औद्योगिक क्षेत्र यापासून जवळच असल्याने या प्रकल्पाला मंजूरी नाकरण्यात आली. नंतर हा प्रकल्प जालना तालुक्यातील खरपूडी येथे उभारण्यासाठीची जागा निश्चित करण्यात आली. त्यासाठी सिडकोने अध्यादेश काढून जागेची मोजणी तसेच संपादनाची प्रक्रियाही सुरू केली होती.ही मोजणी सुरू असतांना या परिसरातील शेतकऱ्यांचा याला विरोध होता. ग्रीन आणि येलो झोन असे जमिनिचे विभाग पडत असल्याने त्यांच्या दरात प्रचंड तफावत आहे. तसेच सिडको केवळ हा परिसर संपादीत करून येथे अद्ययावत ले-आऊट उभारून देणार आहे. नियोजित शहर कसे असावे याचा आराखडा ते आखून देणार असून, गृहप्रकल्प उभारणी बाबत त्यांनी अद्याप कुठलाच निर्णय घेतलेला नाही. त्यातच आता पुन्हा खरपूडी येथे हा प्रकल्प फिजिबल नसल्याचा मुद्दा पुढे करून एका खाजगी कंपनीकडून या भागाचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले असून, सिडकोने हा प्रकल्प याच भागात होणार की, दुसरीकडे जाणार हे स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.दानवे, गोरंट्याल आणि खोतकरांचा निर्णयआजघडीला आता राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यामुळे युती सरकारने घेतलेले निर्णय धडाधड रद्द करण्याचे काम नवीन सरकारने हाती घेतले आहे. त्यामुळे केंद्रात राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवेंसह आता या प्रकल्पाचे भवितव्य हे खºया अर्थाने आ. कैलास गोरंट्याल आणि माजी राज्यमंत्री तथा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :cidcoसिडकोMigrationस्थलांतरणArjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवे