शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

धक्कादायक ! एकाच महिन्यात २४ शेतकऱ्यांनी संपविली जीवन यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 13:18 IST

farmer suicide News : नैसर्गिक, सुलतानी संकट, शेतमालाला नसलेला भाव, कर्जाचा डोंगर अशा अनेक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला जीवनप्रवास थांबविला आहे.

ठळक मुद्देसात महिन्यांत ५० शेतकऱ्यांच्या आत्महत्याकोरोनामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

- दीपक ढोलेजालना : अनेक संकटांशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाचाही मुकाबला सुरू केला आहे. मात्र, असे असले तरी जूनच्या एकाच महिन्यात जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. गत सात महिन्यांत ५० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. (  In a single month, 24 farmers completed their life journey) 

नैसर्गिक, सुलतानी संकट, शेतमालाला नसलेला भाव, कर्जाचा डोंगर अशा अनेक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला जीवनप्रवास थांबविला आहे. २००१ ते २०२१ या काळात तब्बल ७४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चौकशी केल्यानंतर यातील ६२९ पात्र, तर ११३ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात, यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या गेल्या. मात्र, यातील किती योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ झाला, यावर वाद-विवाद सुरूच आहे. असे असले तरी शेतकऱ्यांमागे लागलेले समस्यांचे शुक्‍लकाष्ठ काही संपलेले नाही. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी अशा संकटात शेतकरी कायमच अडकलेला आहे. यंदा तर कोरोनाच्या संकटातही शेतकरीच जास्त भरडला जात आहे. कोरोना काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. २०२० साली ८८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे, तर मागील सात महिन्यात ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या जून महिन्यात २४ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपविली असून, त्यापैकी ४६ आत्महत्या पात्र ठरविण्यात आले आहेत.

कोरोनामुळे शेतकरी अडचणीतरब्बी हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना या काळातील पीक एकतर कवडीमोल भावाने विकण्याची; तर काहींवर अक्षरश: फेकून देण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकरी या काळातही अडचणीत आला होता. देश लॉकडाऊन असताना शेतकरी आपल्या शेतातील माल विकावा कसा, या मानसिकतेत होते. यामुळेच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

सात महिन्यांत ५० शेतकऱ्यांच्या आत्महत्याजानेवारी ते जुलै या काळात जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ४६ शेतकरी आत्महत्या पात्र ठरल्या असून, ४ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. येणाऱ्या काळात शेती तसेच शेतकरी या वर्गाला कसा दिलासा देता येईल, याचा विचार होणे आता गरजेचे झाले आहे.

गेल्या सात महिन्यात झालेल्या आत्महत्यामहिना             एकूण आत्महत्याजानेवारी                        ०८फेबुवारी                         ०३मार्च                         ०४एप्रिल                         ०२मे                         ०४जून                         २४जुलै                         ०५ 

टॅग्स :Jalanaजालनाagricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्याcorona virusकोरोना वायरस बातम्या