शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

१९ हजार शेतकऱ्यांना वीज वितरणाचा 'शॉक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

जालना : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ५० टक्के सवलत याेजना लागू करून वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला ...

जालना : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ५० टक्के सवलत याेजना लागू करून वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला आहे. तालुक्यातील १९ हजार कृषिपंपांची वीज तोडण्यात आली असून, त्यामुळे हजारो हेक्टरवरील रब्बीची पिके धोक्यात आली आहेत.

यापूर्वी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. रब्बीतील गहू, हरभरा आदी पिके चांगली आली आहेत, तर मोसंबी, द्राक्ष, पेरू, अंबा आदी फळबागाही फुलल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हाती काही दिवसांत ही पिके येणार आहेत. परंतु, महावितरणने थकीत वीजबिल वसुलीसाठी चक्क वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मोसंबीच्या बागेला पाणी दिले नाही तर मोसंबीची फुलगळ, गुंडीगळ होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. शासनस्तरावरून या बाबींचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. हरभरा घाटे अवस्थेत तर गहू लोंब्या अवस्थेत आहे. वेळेवर पाणी मिळाले नाही तर येथेही उत्पादनामध्ये घट होणार आहे.

तालुक्यात ३३ केव्हीचे १४ व १३२ केव्हीचे चार उपकेंद्र आहेत. या उपककेंद्रांतून शेतीला वीजपुरवठा केला जातो. वीजबिलापोटी आजवर १९ हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

मोहीम सुरूच राहणार

आजवर जवळपास १९ हजार कृषिपंपांची वीजतोडणी करण्यात आली आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी उर्वरित दिवसांत आणखी वीजजोडणी कट केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी थकीत वीजबिले भरून योजनेचा लाभ घ्यावा.

व्ही.एस. कुलकर्णी

उपकार्यकारी अभियंता, जालना ग्रामीण