शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

१९ हजार शेतकऱ्यांना वीज वितरणाचा 'शॉक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

जालना : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ५० टक्के सवलत याेजना लागू करून वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला ...

जालना : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ५० टक्के सवलत याेजना लागू करून वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला आहे. तालुक्यातील १९ हजार कृषिपंपांची वीज तोडण्यात आली असून, त्यामुळे हजारो हेक्टरवरील रब्बीची पिके धोक्यात आली आहेत.

यापूर्वी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. रब्बीतील गहू, हरभरा आदी पिके चांगली आली आहेत, तर मोसंबी, द्राक्ष, पेरू, अंबा आदी फळबागाही फुलल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हाती काही दिवसांत ही पिके येणार आहेत. परंतु, महावितरणने थकीत वीजबिल वसुलीसाठी चक्क वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मोसंबीच्या बागेला पाणी दिले नाही तर मोसंबीची फुलगळ, गुंडीगळ होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. शासनस्तरावरून या बाबींचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. हरभरा घाटे अवस्थेत तर गहू लोंब्या अवस्थेत आहे. वेळेवर पाणी मिळाले नाही तर येथेही उत्पादनामध्ये घट होणार आहे.

तालुक्यात ३३ केव्हीचे १४ व १३२ केव्हीचे चार उपकेंद्र आहेत. या उपककेंद्रांतून शेतीला वीजपुरवठा केला जातो. वीजबिलापोटी आजवर १९ हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

मोहीम सुरूच राहणार

आजवर जवळपास १९ हजार कृषिपंपांची वीजतोडणी करण्यात आली आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी उर्वरित दिवसांत आणखी वीजजोडणी कट केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी थकीत वीजबिले भरून योजनेचा लाभ घ्यावा.

व्ही.एस. कुलकर्णी

उपकार्यकारी अभियंता, जालना ग्रामीण