शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

सेनेच्या वाघाचा बनला कासव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:26 IST

शिवसेना बुजगावणी झाली असून, सेनेच्या वाघाचा आता कासव बनला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

जाफराबाद/घनसावंगी : शिवसेना बुजगावणी झाली असून, सेनेच्या वाघाचा आता कासव बनला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. जाफराबाद व घनसावंगी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आयोजित हल्लाबोल मोर्चात ते बोलत होते. या वेळी त्यांनी सरकारच्या धोरणावर चौफेर टीका केली.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दुपारी हल्लाबोल मोर्चास सुरुवात झाली. या वेळी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खा. माजिद मेमन, जयंत पाटील, आ. राजेश टोपे, माजी आ. चंद्रकांत दानवे, राजेंद्र शिंगणे, माजी खा. कुंडलिक दानवे, कदीर मौलाना, विजय साळवे, डॉ. निसार देशमुख, महिला अध्यक्षा सुरेखा लहाने, रंगनाथ काळे, सुधाकर दानवे, राजेश चव्हाण, लक्ष्मण ठोंबरे, केशव जंजाळ, दीपक पाटील, सऊद शेख यांची उपस्थिती होती.अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील हे सरकार शेतकरी हिताचे नाही. या काळात १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील १ कोटी ३० लाख शेतक-यांपैकी फक्त ८९ लाख शेतक-यांचे कर्ज माफी झाल्याची फसवी घोषणा शासन करीत आहे. आजपर्यंत शेतक-यांच्या खात्यात काहीच रक्कम जमा झाली नाही. किती कर्ज माफी झाले याची माहिती सरकार जाहीर करत नाही. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे शेतकºयांच्या कमरेखाली गोळ्या घालण्याची भाषा करतात. न्यायाधीशांना सुद्धा जनतेसमोर यावे लागत आहे. विकासाची भाषा करणारे उलट वाळू माफियांना पाठीशी घालत आहेत, अशी चौफेर टीका पवार यांनी केली.आ. टोपे म्हणाले की, भाजप नेते खोटे बोलण्यात पटाईत आहेत. राज्यात जातीय राजकारण केले जात आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत.माजी आ. दानवे यांनी जाफराबाद तालुक्यातील शेतकºयांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून लिफ्ट इरिगिशनद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, ऊस गाळपाचा प्रश्न सोडावा, असे सांगून सरकारवर टीका केली. या वेळी तहसीलदार जे. डी. वळवी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.या वेळी तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण, कौसर शेख, संतुकराव उबाळे, रामधन कळंबे, कपिल आकात, दत्तू पंडित, वामन दांडगे, कैलास दिवटे, मुजीब शेख, बंटी औटी, नंदकुमार गि-हे, मनीषा जंजाळ, सुनीता सावंत, नईम कादरी, रविराज जैस्वाल, शेख बाबू, राजेश म्हस्के, गजू लोखंडे, फैसल चाऊस यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. घनसावंगी येथेही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.आयजीच्या जिवावर बायजी..बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. असे असताना निकृष्ट बियाणे देणा-या कंपन्यांकडून पैसे घेऊन सरकार शेतक-यांना मदत देणार आहे. वा रे सरकार, आयजीच्या जिवावर बायजी उदार, असा हा प्रकार असल्याची खोचक टीका पवार यांनी केली. राज्यातील शेतक-यांवर जेव्हा संकटे आली, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. परंतु आताच्या सरकारने आश्वासनांपलीकडे काहीच दिले नसल्याचे ते म्हणाले.-------------------...तर हिंमत झाली असती का?घनसावंगी : ‘कमळाबाई’ शिवसेनेचे आमदार फोडण्याची घोषणा करत आहेत. यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये आले कोठून, बाळासाहेब असते तर हिमंत झाली असती का, असा सवाल अजित पवार यांनी घनसावंगी येथे बोलताना उपस्थित केला. पैशाच्या जोरावर भाजप लोकशाहीचा गळा घोटत असल्याचे ते म्हणाले.------------पायाखालची वाळू सरकली-मुंडेमराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे विधान परिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. सरकारच्या विविध धोरणांवर त्यांनी टीका केली.