शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

सायेब..द्राक्ष, डाळिंबासोबतच कपाशी, सोयाबीनबी हातातून गेलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST

सोमवारी सकाळी या पथकातील अधिकाऱ्यांचा ताफा औरंगाबादहून निघून बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे पोहोचला. तेथील शेतीसह रस्त्यांची पाहणी पथकाने केली. ...

सोमवारी सकाळी या पथकातील अधिकाऱ्यांचा ताफा औरंगाबादहून निघून बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे पोहोचला. तेथील शेतीसह रस्त्यांची पाहणी पथकाने केली. या भागातही मोठा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले. या पथकाने तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे ज्या रोशनगाव येथे अतिवृष्टीत एका रात्री २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्या गावालाही पथकाने भेट दिली. सकाळी आठ वाजेपासून हा त्यांचा दौरा सुरू होता.

चौकट

द्राक्ष बागांचे मोठे नुकसान

जालना तालुक्यातील कडवंची आणि नंदापूर येथे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागा आहेत. तसेच या भागातील धारकल्याण, पीरकल्याण, न्हावा आदी गावांमध्ये आता डाळिंबाच्या बागाही फुलल्या आहेत. त्यामुळे यंदा द्राक्षांना लागेल्या घडांचे प्रमाण हे नगण्य आहे. त्यामुळे यंदा किमान तीन ते चार लाख रुपयांचा फटका बसणार असल्याची माहिती प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले.

चौकट

केंद्र सरकारने नुकसानभरपाई तातडीने द्यावी, यासाठी यात आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. यावेळी त्यांनी पथकाला सांगितले की, फळबागांसह कापूस, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा पाऊस पडूनही शेतकरी अडचणीत असल्याने त्यांना केंद्र सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली. तसेच आपण केंद्रातील कृषिमंत्र्यांसह कृषी सचिवांना बोलून मदत मिळवून देऊ, असे आश्वासन आ. गोरंट्याल यांनी दिले.

चौकट

शेतमालाच्या आवकीवर परिणाम

प्रारंभी चांगला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदित होता; परंतु ऐन काढणीला पिके आल्यावर अतिवृष्टीने आणि परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मदत केलीच आहे; परंतु केंद्राने आता या पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यावर ती मदत तातडीने करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री तसेच केंद्राकडे करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ. खरीप हंगामात बाजार समितीत येणाऱ्या कृषी मालाची आवक जवळपास ४० टक्के कमी झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी सांगितले.