शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

सायेब..द्राक्ष, डाळिंबासोबतच कपाशी, सोयाबीनबी हातातून गेलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST

सोमवारी सकाळी या पथकातील अधिकाऱ्यांचा ताफा औरंगाबादहून निघून बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे पोहोचला. तेथील शेतीसह रस्त्यांची पाहणी पथकाने केली. ...

सोमवारी सकाळी या पथकातील अधिकाऱ्यांचा ताफा औरंगाबादहून निघून बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे पोहोचला. तेथील शेतीसह रस्त्यांची पाहणी पथकाने केली. या भागातही मोठा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले. या पथकाने तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे ज्या रोशनगाव येथे अतिवृष्टीत एका रात्री २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्या गावालाही पथकाने भेट दिली. सकाळी आठ वाजेपासून हा त्यांचा दौरा सुरू होता.

चौकट

द्राक्ष बागांचे मोठे नुकसान

जालना तालुक्यातील कडवंची आणि नंदापूर येथे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागा आहेत. तसेच या भागातील धारकल्याण, पीरकल्याण, न्हावा आदी गावांमध्ये आता डाळिंबाच्या बागाही फुलल्या आहेत. त्यामुळे यंदा द्राक्षांना लागेल्या घडांचे प्रमाण हे नगण्य आहे. त्यामुळे यंदा किमान तीन ते चार लाख रुपयांचा फटका बसणार असल्याची माहिती प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले.

चौकट

केंद्र सरकारने नुकसानभरपाई तातडीने द्यावी, यासाठी यात आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. यावेळी त्यांनी पथकाला सांगितले की, फळबागांसह कापूस, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा पाऊस पडूनही शेतकरी अडचणीत असल्याने त्यांना केंद्र सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली. तसेच आपण केंद्रातील कृषिमंत्र्यांसह कृषी सचिवांना बोलून मदत मिळवून देऊ, असे आश्वासन आ. गोरंट्याल यांनी दिले.

चौकट

शेतमालाच्या आवकीवर परिणाम

प्रारंभी चांगला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदित होता; परंतु ऐन काढणीला पिके आल्यावर अतिवृष्टीने आणि परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मदत केलीच आहे; परंतु केंद्राने आता या पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यावर ती मदत तातडीने करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री तसेच केंद्राकडे करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ. खरीप हंगामात बाजार समितीत येणाऱ्या कृषी मालाची आवक जवळपास ४० टक्के कमी झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी सांगितले.