शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

शिस्तभंगाचा ठपका ठेवत कंत्राटी तज्ज्ञावर निलंबनाची संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

गेल्या वर्षी कोरोनाचा कहर वाढत असल्याने जालना येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या पुढाकारातून दहा कोटी रुपये ...

गेल्या वर्षी कोरोनाचा कहर वाढत असल्याने जालना येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या पुढाकारातून दहा कोटी रुपये खर्च करून अद्ययावत कोविड लॅबची उभारणी करण्यात आली. या आधी हे सर्व कोरोना संशयितांचे नमुने हे औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. तेथून अहवाल येण्यास विलंब होत होता. हे कारण पुढे करून जालन्यात ही लॅब- चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली होती; परंतु या लॅबमध्ये शासनस्तरावरून जे तज्ज्ञ रुजू होणे अपेक्षित होते. ते मोठे प्रयत्न करूनही उपलब्ध झाले नाहीत.

त्यामुळे येथील एका बियाणे कंपनीतील सूक्ष्मजीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी केलेल्या गिरीश कांबळे यांना कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आले होते, तसेच येथील ज्येष्ठ पॅथोलॉजिस्ट डॉ. सूर्यकांत हयातनगररकर यांच्या मार्गदर्शनाखाली या लॅबची उभारणी करण्यात येऊन त्यांच्याकडूनही आटीपीसीआरचे नमुने शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे तपासायाचे याचे मार्गदर्शन घेतले. त्यांनीदेखील कोरोनाकाळात मोठी हिंमत दाखून ही लॅब उभी केली, तसेच ती सुरळीत चालावी म्हणून योगदानही दिले; परंतु त्यांनी आता या कामातून स्वेच्छेने दूर ठेवले आहे. त्यांच्यानंतर येथील तज्ज्ञ म्हणून कांबळे हे आरटीपीसीआरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणे, तसेच त्यांची तांत्रिकदृष्ट्या मांडणी करून त्याचे पृथक्करण करणे आदी कामे कांबळे करत असत; परंतु त्यांच्यात आणि तेथील एका पॅथोलॉजिस्टमध्ये शाब्दिक वादंग होऊन कांबळे यांनी त्यांना अपशब्द वापरण्यात आल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली होती. यावर चौकशी समिती नेमून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले.

नंतर या समितीच्या अहवालानंतर कांबळे यांना जे कंत्राटी तत्त्वावर प्रयोगशाळेत कार्यरत होते, त्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार लॅबमधील २ ते ४ फेब्रवारीदरम्यान जे सर्व आरटीपीसीआरचे नमुने तपासले आहेत, त्यांची सर्व चौकशी ही तज्ज्ञांकडून झाल्यास तथ्य समोर येईल, असा दावा कांबळे यांनी लोकमत कार्यालयात येऊन केला आहे.

शिस्तभंगामुळेच कांबळेंवर कारवाई

कोविड लॅबमधील नमुने तपासणीच्या कामांत कुठलाच तांत्रिक दोष नाही. यावर आपला विश्वास असून, गिरीश कांबळे यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती होती. त्यादरम्यान त्यांनी जी कार्यालयीन शिस्त तसेच निर्देश असतात, त्यांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याने त्यांना कमी केले आहे. नमुन्यांच्या तपासणीबद्दल जे गैरसमज पसरविले जात आहेत, त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

-डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना