शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शिस्तभंगाचा ठपका ठेवत कंत्राटी तज्ज्ञावर निलंबनाची संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

गेल्या वर्षी कोरोनाचा कहर वाढत असल्याने जालना येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या पुढाकारातून दहा कोटी रुपये ...

गेल्या वर्षी कोरोनाचा कहर वाढत असल्याने जालना येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या पुढाकारातून दहा कोटी रुपये खर्च करून अद्ययावत कोविड लॅबची उभारणी करण्यात आली. या आधी हे सर्व कोरोना संशयितांचे नमुने हे औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. तेथून अहवाल येण्यास विलंब होत होता. हे कारण पुढे करून जालन्यात ही लॅब- चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली होती; परंतु या लॅबमध्ये शासनस्तरावरून जे तज्ज्ञ रुजू होणे अपेक्षित होते. ते मोठे प्रयत्न करूनही उपलब्ध झाले नाहीत.

त्यामुळे येथील एका बियाणे कंपनीतील सूक्ष्मजीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी केलेल्या गिरीश कांबळे यांना कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आले होते, तसेच येथील ज्येष्ठ पॅथोलॉजिस्ट डॉ. सूर्यकांत हयातनगररकर यांच्या मार्गदर्शनाखाली या लॅबची उभारणी करण्यात येऊन त्यांच्याकडूनही आटीपीसीआरचे नमुने शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे तपासायाचे याचे मार्गदर्शन घेतले. त्यांनीदेखील कोरोनाकाळात मोठी हिंमत दाखून ही लॅब उभी केली, तसेच ती सुरळीत चालावी म्हणून योगदानही दिले; परंतु त्यांनी आता या कामातून स्वेच्छेने दूर ठेवले आहे. त्यांच्यानंतर येथील तज्ज्ञ म्हणून कांबळे हे आरटीपीसीआरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणे, तसेच त्यांची तांत्रिकदृष्ट्या मांडणी करून त्याचे पृथक्करण करणे आदी कामे कांबळे करत असत; परंतु त्यांच्यात आणि तेथील एका पॅथोलॉजिस्टमध्ये शाब्दिक वादंग होऊन कांबळे यांनी त्यांना अपशब्द वापरण्यात आल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली होती. यावर चौकशी समिती नेमून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले.

नंतर या समितीच्या अहवालानंतर कांबळे यांना जे कंत्राटी तत्त्वावर प्रयोगशाळेत कार्यरत होते, त्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार लॅबमधील २ ते ४ फेब्रवारीदरम्यान जे सर्व आरटीपीसीआरचे नमुने तपासले आहेत, त्यांची सर्व चौकशी ही तज्ज्ञांकडून झाल्यास तथ्य समोर येईल, असा दावा कांबळे यांनी लोकमत कार्यालयात येऊन केला आहे.

शिस्तभंगामुळेच कांबळेंवर कारवाई

कोविड लॅबमधील नमुने तपासणीच्या कामांत कुठलाच तांत्रिक दोष नाही. यावर आपला विश्वास असून, गिरीश कांबळे यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती होती. त्यादरम्यान त्यांनी जी कार्यालयीन शिस्त तसेच निर्देश असतात, त्यांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याने त्यांना कमी केले आहे. नमुन्यांच्या तपासणीबद्दल जे गैरसमज पसरविले जात आहेत, त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

-डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना