जालना : जालना जिल्ह्यातील ७०० पैकी ३० बसचालकांकडून मागील वर्षात अपघात झाला आहे. यात काहीजण जखमी झाले आहेत.
जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद, परतूर व मंठा येथे बसस्थानक आहे. या बसस्थानकांमध्ये जवळपास ७०० बसचालक कार्यरत आहेत. एस. टी.ला सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजले जाते. लालपरीचा प्रवास सुरक्षित असल्याने बहुतांश जण एस. टी.नेच प्रवास करतात. त्यामुळे बसमध्ये नेहमीच गर्दी असते. सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी एस. टी. किती सुरक्षित आहे, याचा आढावा घेतला असता, मागील वर्षभरात ७००पैकी ३० चालकांकडून अपघात झाल्याचे समोर आले. विनाअपघात बस चालविलेल्या चालकांचा दरवर्षी सत्कारही करण्यात येतोे. त्यानुसार १० वर्ष विनाअपघात बस चालविलेल्या १४६ तर १५ वर्ष विनाअपघात बस चालविलेल्या १३ जणांचा सत्कार करण्यात आला आहे.
जानेवारी ५
फेब्रुवारी ४
मार्च ४
ऑगस्ट १
सप्टेंबर २
ऑक्टोबर ३
नोव्हेंबर ३
डिसेंबर ८
६०ला स्पीड लॉक
बसेसना ६०चे स्पीड लॉक आहे. मात्र, असे असतानाही अपघात होतात. काही चालक बस चालवत असताना मोबाईलचा वापर करतात. तर काही चालक रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत बस चालवत असल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. काही ठिकाणी दुसरी वाहने बसला धडकल्याने अपघात झाला आहे.