शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

सर्वसामान्यांची एस. टी. किती सुरक्षित? ७०० पैकी ३० बसचालकांकडून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जालना : जालना जिल्ह्यातील ७०० पैकी ३० बसचालकांकडून मागील वर्षात अपघात झाला आहे. यात काहीजण जखमी झाले आहेत. ...

जालना : जालना जिल्ह्यातील ७०० पैकी ३० बसचालकांकडून मागील वर्षात अपघात झाला आहे. यात काहीजण जखमी झाले आहेत.

जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद, परतूर व मंठा येथे बसस्थानक आहे. या बसस्थानकांमध्ये जवळपास ७०० बसचालक कार्यरत आहेत. एस. टी.ला सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजले जाते. लालपरीचा प्रवास सुरक्षित असल्याने बहुतांश जण एस. टी.नेच प्रवास करतात. त्यामुळे बसमध्ये नेहमीच गर्दी असते. सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी एस. टी. किती सुरक्षित आहे, याचा आढावा घेतला असता, मागील वर्षभरात ७००पैकी ३० चालकांकडून अपघात झाल्याचे समोर आले. विनाअपघात बस चालविलेल्या चालकांचा दरवर्षी सत्कारही करण्यात येतोे. त्यानुसार १० वर्ष विनाअपघात बस चालविलेल्या १४६ तर १५ वर्ष विनाअपघात बस चालविलेल्या १३ जणांचा सत्कार करण्यात आला आहे.

जानेवारी ५

फेब्रुवारी ४

मार्च ४

ऑगस्ट १

सप्टेंबर २

ऑक्टोबर ३

नोव्हेंबर ३

डिसेंबर ८

६०ला स्पीड लॉक

बसेसना ६०चे स्पीड लॉक आहे. मात्र, असे असतानाही अपघात होतात. काही चालक बस चालवत असताना मोबाईलचा वापर करतात. तर काही चालक रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत बस चालवत असल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. काही ठिकाणी दुसरी वाहने बसला धडकल्याने अपघात झाला आहे.