शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

२७१० कोटी रुपयांचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:22 IST

जालना जिल्ह्याचा २०१९-२० चा जिल्हा वार्षिक आराखडा बुधवारी झालेल्या बैठकीत प्रकाशित करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्याचा २०१९-२० चा जिल्हा वार्षिक आराखडा बुधवारी झालेल्या बैठकीत प्रकाशित करण्यात आला. यावेळी दोन हजार ७१० कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या आराखड्यात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात वार्षिक पतआराखड्याचे विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बिनवडे, महाराष्ट्र बँकेचे उप महाव्यवस्थापक जी.जी. वाकडे, रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी सूरज फोंगसे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निशांत इलमकर, नाबार्डचे पी.जी. भागवतकर, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, जिल्हा सहनिबंधक एन.व्ही. आघाव, मध्यवर्ती बँकेचे मुख्य व्यवस्थापक आशुतोष देशमुख, स्टेट बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक ढगे, सिंडीकेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक गुंडेकर यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी बिनवडे यांनी सांगितले की, शासनाकडून दुष्काळी अनुदान, बोंडअळी अनुदान, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आदींचे कोट्यवधी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी बँकांमध्ये पाठविले आहेत. दरम्यान ते सर्व पैसे तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून दुष्काळात शेतक-यांना आर्थिक मदत करावी, असे सांगितले.पीक कर्जासह विविध महामंडळाच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जाचा आढावा यावेळी घेण्यात आला. गतवर्षी या महामंडळाकडून २६५ लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले.खरीप पीक विमा भरण्यासाठीची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू असून, २४ जुलैपर्यंत शेतक-यांना पीक विमा भरता येणार आहे.पीक विमा सहज पद्धतीने भरता यावा म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या असून, जालना जिल्ह्यासाठी बजाज अलायंन्स या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. पत आराखड्यामध्ये दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी ३५० कोटी तर लघु व मध्यम उद्योगासाठी ४९० कोटी यासह अन्य आवश्यक गरजांसाठी ३७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच्या वाटपाचे नियोजन करण्याचे सुचवले आहे.जालना : पीककर्ज वाटपात अव्वलगेल्या वर्षी जालना जिल्ह्याने मराठवाड्यात अव्वल स्थान कायम राखत १ हजार ९६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले होते. यंदाही अशीच चांगली कामगिरी करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. यंदाच्या वार्षिक पतआराखड्यात पीककर्ज वाटपासाठी लक्षणीय तरतूद म्हणजेच १ हजार ५०० कोटी रुपये राखून ठेवले आहेत.पीक कर्जाचे नूतनीकरण करून घेतल्यास शेतक-यांना ७ टक्के व्याजाची सवलत मिळणार आहे. त्यामुळे याकडेही शेतक-यांनी लक्ष देण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. ई-सुविधा केंद्रांवर शेतक-यांनी कुठलेही शुल्क न देता अर्ज भरून द्यावेत.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाGovernmentसरकारgovernment schemeसरकारी योजना