शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

सम्यक विचार, दूरदृष्टी आणि सुदृढता या त्रिसूत्रीनुसार मार्गक्रमण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 01:05 IST

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनच्या सातव्या सत्रातील तृतीय कार्यकारिणीची बैठक आणि अष्टम सत्र पदग्रहण समारोहास शुक्रवारी प्रारंभ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्याच्या महिला संघटनचे कार्य अत्यंत कौतुकस्पद आहे. असे असले तरी समाजाच्या उन्नतीसाठी महिलांबरोबरच पुरुष प्रधान संस्कृतीने आणि युवा संघटनने देखील आपली ताकद स्त्री शक्तीच्या पाठीशी भक्कमपणे उभी करुन सम्यक विचार, दूरदृष्टी आणि सुदृढता या त्रिसूत्रीनुसार मार्गक्रमण केल्यास कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन माहेश्वरी समाजाच्या कार्यकर्त्या सुशीला काबरा यांनी येथे बोलताना केले.महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनच्या सातव्या सत्रातील तृतीय कार्यकारिणीची बैठक आणि अष्टम सत्र पदग्रहण समारोहास शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी निवडणूक अधिकारी लता लाहोटी, माहेश्वरी समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, उपाध्यक्ष संजय दाड, युवा संघटनचे प्रदेशाध्यक्ष शरद काबरा, पुष्पा तोष्णीवाल, शैला कलंत्री, अनुसया मालू, महिला संघटनच्या जिल्हाध्यक्षा निर्मला साबू, जिल्हा सचिव मीनाक्षी दाड, महिला प्रदेश उपाध्यक्षा मंगल भंडारी, माजी अध्यक्षा निर्मला करवा, महिला प्रदेश सहसचिव सूर्यमाला मालाणी आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना काबरा म्हणाल्या, स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आपल्या अंगी आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रहिताच्या उज्वल भविष्यासाठी नारीशक्तीचं मोठं योगदान राहिलेलं असून यापुढेही ही शक्ती कमी होणार नाही. त्यामुळे हे राष्ट्र निश्चितच प्रगतीच्या दिशेने चालेल, असे सांगून त्या म्हणाल्या की, महिला संघटनमध्ये काम करत असताना आता पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. नारी शक्तीच्या पाठीशी प्रत्येकाची शक्ती एकवटत आहे. त्यामुळे समाज देखील प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र समाजाची उन्नती- प्रगती साधायची असेल तर आपल्याला सम्यक विचार ठेवावे लागतील, असेही त्या म्हणाल्या.त्यानंतर इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी जालना जिल्हा माहेश्वरी महिला संघटनच्या जिल्हाध्यक्ष निर्मला साबू, सचिव मीनाक्षी दाड, कोषाध्यक्षा सरोज करवा, संघटनमंत्री राजश्री दरक, उपाध्यक्षा नूतन दाड, शिल्पा मालपाणी, कृष्णा मंत्री, पद्मा तापडिया, सहसचिव कविता लखोटिया, श्रध्दा जेथलिया, शारदा बाहेती, अनिता राठी, संघटनमंत्री संगीता लाहोटी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सर्व समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.माहेश्वरी समाजासह दीन- दुबळ्यांसाठी सातत्याने कार्यमग्न राहणा-या चंद्रकला भक्कड आणि मीराबाई मुंदडा यांना माहेश्वरी महिला संघटनच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्प गुच्छ देऊन त्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.

टॅग्स :communityसमाजWomenमहिला