शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

सम्यक विचार, दूरदृष्टी आणि सुदृढता या त्रिसूत्रीनुसार मार्गक्रमण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 01:05 IST

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनच्या सातव्या सत्रातील तृतीय कार्यकारिणीची बैठक आणि अष्टम सत्र पदग्रहण समारोहास शुक्रवारी प्रारंभ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्याच्या महिला संघटनचे कार्य अत्यंत कौतुकस्पद आहे. असे असले तरी समाजाच्या उन्नतीसाठी महिलांबरोबरच पुरुष प्रधान संस्कृतीने आणि युवा संघटनने देखील आपली ताकद स्त्री शक्तीच्या पाठीशी भक्कमपणे उभी करुन सम्यक विचार, दूरदृष्टी आणि सुदृढता या त्रिसूत्रीनुसार मार्गक्रमण केल्यास कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन माहेश्वरी समाजाच्या कार्यकर्त्या सुशीला काबरा यांनी येथे बोलताना केले.महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनच्या सातव्या सत्रातील तृतीय कार्यकारिणीची बैठक आणि अष्टम सत्र पदग्रहण समारोहास शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी निवडणूक अधिकारी लता लाहोटी, माहेश्वरी समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, उपाध्यक्ष संजय दाड, युवा संघटनचे प्रदेशाध्यक्ष शरद काबरा, पुष्पा तोष्णीवाल, शैला कलंत्री, अनुसया मालू, महिला संघटनच्या जिल्हाध्यक्षा निर्मला साबू, जिल्हा सचिव मीनाक्षी दाड, महिला प्रदेश उपाध्यक्षा मंगल भंडारी, माजी अध्यक्षा निर्मला करवा, महिला प्रदेश सहसचिव सूर्यमाला मालाणी आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना काबरा म्हणाल्या, स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आपल्या अंगी आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रहिताच्या उज्वल भविष्यासाठी नारीशक्तीचं मोठं योगदान राहिलेलं असून यापुढेही ही शक्ती कमी होणार नाही. त्यामुळे हे राष्ट्र निश्चितच प्रगतीच्या दिशेने चालेल, असे सांगून त्या म्हणाल्या की, महिला संघटनमध्ये काम करत असताना आता पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. नारी शक्तीच्या पाठीशी प्रत्येकाची शक्ती एकवटत आहे. त्यामुळे समाज देखील प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र समाजाची उन्नती- प्रगती साधायची असेल तर आपल्याला सम्यक विचार ठेवावे लागतील, असेही त्या म्हणाल्या.त्यानंतर इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी जालना जिल्हा माहेश्वरी महिला संघटनच्या जिल्हाध्यक्ष निर्मला साबू, सचिव मीनाक्षी दाड, कोषाध्यक्षा सरोज करवा, संघटनमंत्री राजश्री दरक, उपाध्यक्षा नूतन दाड, शिल्पा मालपाणी, कृष्णा मंत्री, पद्मा तापडिया, सहसचिव कविता लखोटिया, श्रध्दा जेथलिया, शारदा बाहेती, अनिता राठी, संघटनमंत्री संगीता लाहोटी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सर्व समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.माहेश्वरी समाजासह दीन- दुबळ्यांसाठी सातत्याने कार्यमग्न राहणा-या चंद्रकला भक्कड आणि मीराबाई मुंदडा यांना माहेश्वरी महिला संघटनच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्प गुच्छ देऊन त्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.

टॅग्स :communityसमाजWomenमहिला