शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कोरोनाच्या काळात आशांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST

जालना : मागील आठ ते नऊ महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. या काळात आशांनी रात्रंदिवस काम करून आपली जबाबदारी ...

जालना : मागील आठ ते नऊ महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. या काळात आशांनी रात्रंदिवस काम करून आपली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे आता कुठे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोनाच्या काळात आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी केले.

आरोग्य विभागातर्फे आशा दिनानिमित्त शुक्रवारी जालना शहरातील फुलंब्रीकर नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. सीईओ अरोरा म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात आशा स्वयंसेविकांनी जे काम केले ते कौतुकास्पद आहे. गावागावांत कोरोनाची भीती पसरलेली असतानाही जीवाची पर्वा न करता त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी केली. त्यानंतर माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीमही यशस्वीपणे राबविली. त्यामुळेच आता कुठे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. येणाऱ्या वर्षातही आशांनी चांगले काम करावे, असे आवाहनही अरोरा यांनी केले. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आशा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत ज्योती तांबट (प्रथम), कल्पना गाढे (द्वितीय), गौरी कुचन (तृतीय), पोस्टर स्पर्धेत कविता कांबळे (प्रथम), रेखा भिंगारे (द्वितीय), रेखा पुरी (तृतीय) तर होम मेड केक स्पर्धेत निर्मला कोल्हे (प्रथम), शैला पांगरकर (द्वितीय), वेशभूषा स्पर्धेत वैशाली गंगातीवरे (प्रथम), किरण बोरकर (द्तिीय) तर कुसुम मोगरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी सोनी यांच्यासह आशा स्वयंसेविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.