शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

वर्षभरानंतरही तीन रस्त्यांची कामे अपूर्णच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:11 IST

वर्षभरानंतरही सहा पैकी तीन रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराच्या इतिहासात कधी नव्हे तो रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून आणण्यात आला. पालिकेतील कामे गुणवत्तेची होत नसल्याची ओरड होत असल्याने या रस्त्यांची काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली. असे असले तरी वर्षभरानंतरही सहा पैकी तीन रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र आहे. काँक्रिटीकरणात गुणवत्तेचे तीन तेरा वाजले असून, सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनी संबंधित कंत्राटदाराकडून सदरील कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.जालना शहरात दर सहा महिन्यांनी एकाच रस्त्याचे डांबरीकरण केले जात असे. खड्डेयुक्त रस्त्यांमुळे जालना शहराचा ‘लौकिक’ सर्वदूर पोहोचला. हा लौकिक खºया अर्थाने सुधारण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी शहरातील सर्वच प्रमुख मार्गांचे काँक्रिटीकरण करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घालून विशेष बाब म्हणून तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी आणला. रस्त्यांची कामे सुरु होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयास हा निधी प्राप्त झाला होता.पालिकेकडून गुणवत्तेची कामे होत नसल्याचा नेहमीचा अनुभव असल्याने ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली. मात्र, या कामाच्या निमित्ताने या विभागाचाही अनुभव जालनेकरांना फारसा चांगला आलेला नाही.विशेष म्हणजे काँक्रिटीकरणाचा शुभारंभ शहरात दोन वेळा झाला. मामा चौकात ‘पक्षीय पातळीवर’ भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते पुन्हा या रस्ते कामाचे उद्घाटन झाले.पण श्रेयवादाच्या या प्रयत्नात गुणवत्तेकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांनीही या कामांची तपासणी केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या रस्त्यांच्या कामाबाबत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी झाल्या. या कामांची सुरुवात होऊन वर्ष झाले आहे.तरीही जवळपास तीन रस्त्यांची कामे अद्याप अपूर्णच आहेत. ही कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाºयांना विचारण्याची गरज आहे.