शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वर्षभरानंतरही तीन रस्त्यांची कामे अपूर्णच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:11 IST

वर्षभरानंतरही सहा पैकी तीन रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराच्या इतिहासात कधी नव्हे तो रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून आणण्यात आला. पालिकेतील कामे गुणवत्तेची होत नसल्याची ओरड होत असल्याने या रस्त्यांची काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली. असे असले तरी वर्षभरानंतरही सहा पैकी तीन रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र आहे. काँक्रिटीकरणात गुणवत्तेचे तीन तेरा वाजले असून, सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनी संबंधित कंत्राटदाराकडून सदरील कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.जालना शहरात दर सहा महिन्यांनी एकाच रस्त्याचे डांबरीकरण केले जात असे. खड्डेयुक्त रस्त्यांमुळे जालना शहराचा ‘लौकिक’ सर्वदूर पोहोचला. हा लौकिक खºया अर्थाने सुधारण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी शहरातील सर्वच प्रमुख मार्गांचे काँक्रिटीकरण करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घालून विशेष बाब म्हणून तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी आणला. रस्त्यांची कामे सुरु होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयास हा निधी प्राप्त झाला होता.पालिकेकडून गुणवत्तेची कामे होत नसल्याचा नेहमीचा अनुभव असल्याने ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली. मात्र, या कामाच्या निमित्ताने या विभागाचाही अनुभव जालनेकरांना फारसा चांगला आलेला नाही.विशेष म्हणजे काँक्रिटीकरणाचा शुभारंभ शहरात दोन वेळा झाला. मामा चौकात ‘पक्षीय पातळीवर’ भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते पुन्हा या रस्ते कामाचे उद्घाटन झाले.पण श्रेयवादाच्या या प्रयत्नात गुणवत्तेकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांनीही या कामांची तपासणी केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या रस्त्यांच्या कामाबाबत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी झाल्या. या कामांची सुरुवात होऊन वर्ष झाले आहे.तरीही जवळपास तीन रस्त्यांची कामे अद्याप अपूर्णच आहेत. ही कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाºयांना विचारण्याची गरज आहे.