वाहतूक कोंडी कायम
जालना : शहरांतर्गत मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरच वाहन चालक आपली वाहने लावत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, पादचाऱ्यांना रस्ता शोधताना कसरत करावी लागत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी होत आहे.
रब्बीतील पिके धोक्यात
परतूर : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. वातावरणातील बदलांमुळे रब्बीतील पिकांवर रोगराई पडत आहे. शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत असून, यंदा उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पादचाऱ्यांची गैरसोय
अंबड : शहरांतर्गत मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु, अनेक वाहन चालक रहदारी असलेल्या रस्त्याच्या कडेने वाहने लावत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रशासनाने ही वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
जालना : शहरातील लक्कडकोट भागातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे.