शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

रस्ता, पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:00 IST

वारंवार मागणी करूनही मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने जालना तालुक्यातील तालुक्यातील मौजपुरी येथील व बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / मौजपुरी : वारंवार मागणी करूनही मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने जालना तालुक्यातील तालुक्यातील मौजपुरी येथील व बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीच्या उत्सवातच मतदारांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्याने प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.जालना तालुक्यातील मौजपुरी येथील करुणा मोरे यांनी महिलांच्या वतीने प्रसिध्दीपत्रक काढले आहे. गावात लाखो रूपये खर्च करून विकास कामे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आजही ग्रामस्थांना मूलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्नाचा सामना करावा लागतो. गावातील धार्मिक स्थळावर डोकं टेकविण्यासाठी हजारो भाविक येतात. मात्र, त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे.गावातील मूलभूत प्रश्न सोडविणे, जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे इ. विविध प्रश्न मांडले असून, हे प्रश्न वर्षानुवर्षापासून कायम आहेत. हे प्रश्न कोणत्याच राजकीय नेत्याने सोडविलेले नाहीत. त्यामुळे आम्ही मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकत असल्याचेही मोरे यांनी पत्रकात नमूद केले आहे.बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. जालना- राजूर मार्गाचे काम झाले. मात्र, नाल्यांचे काम न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे अपघात होण्याचे प्रकार घडत असून, शाळकरी मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.मागासवर्गीय वस्तीत थंडी, ताप, मलेरिया, खोकला, डेंग्यू इ. आजार उद्भवले आहेत. या भागात गत दोन वर्षापासून नाल्यांच्या साफसफाईची कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर रतनराज डोळसे, पूनम डोळसे, रोहिणी लोखंडे, गजानन अंकुशकर, यम्मन कातुरे, यशोदा माने, सुनील डोळसे, मिलिंद दाभाडे, संजय डोळसे, छगनराव वाघमारे, सिध्दार्थ पवार, रोहन डोळसे, सिध्दार्थ डोळसे यांच्यासह गावातील जवळपास ६२ ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळी कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.टंचाई : विहिरीतून आणावे लागते पाणीमान देऊळगाव येथे बारमाही पाणीटंचाई आहे. महिलांना विहिरीतून शेंदून पाणी आणावे लागते. यापूर्वी एका महिलेचा पाणी आणताना जीव गेला आहे. बाणेपांगरी आरोग्य उपकेंद्रात महिलांची गैरसोय होत आहे, यासह इतर अनेक समस्या ग्रामस्थांनी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या आहेत.आंदोलनाचा इशारादेऊळगाव येथील ग्रामस्थांनी मुलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय १८ आॅक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनjalna-acजालनाcivic issueनागरी समस्या