शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उत्पादनात भरघोस नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:09 IST

रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांना भरघोस नफ्याची हमी आहे. त्यामुळे रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यशासन शेतक-यांना रेशीम कोश विक्रीवर प्रती किलो ५० रुपये अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांना भरघोस नफ्याची हमी आहे. त्यामुळे रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यशासन शेतक-यांना रेशीम कोश विक्रीवर प्रती किलो ५० रुपये अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रयोगिक तत्त्वावरील पहिल्या रेशीम कोष बाजार पेठेच्या उदघाटन प्रसंगी ते शनिवारी बोलत होते.यावेळी आमदार राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, माजी आ. संतोष सांबरे, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणी, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, पांडुरंग डोंगरे, भानुदास घुगे, रेशीम संचालनालयाचे संचालक संजय कदम, उपसंचालक मुंशी, सहसंचालक दिलीप हाके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले, रेशीम विकास अधिकारी व्ही.एम. भांगे, मनोज मरकड, अनिल सोनी, प्रमोद तोतला आदींची उपस्थिती होती.राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, मराठवाड्यासह राज्यातील रेशीम विकासाला चालना मिळावी या उद्देशाने रेशीम कोष खरेदी केंद्र मराठवाड्यात व्हावे यासाठी मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. शासनाने जालना येथे रेशीम बाजारपेठ खरेदी केंद्राला मान्यता दिली आहे. अडीच एकर जागेवर रेशीम बाजार पेठ उभारण्यात येणार असून, त्यासाठी सहा कोटी १९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या केंद्राचे काम सुरू होईल. तोपर्यंत शेतक-यांना रेशीम कोष विक्रीसाठी परराज्यात जावे लागू नये यासाठी प्रयोगिक बाजापेठ सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. चीनमध्ये सर्वाधिक ८४ टक्के रेशीम कोषाची निर्मिती होते, तर भारतात केवळ १४ टक्के कोष निर्मिती होते. देशात कनार्टक, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर राज्यात अधिक रेशीम उत्पादन घेतले जाते. आता महाराष्ट्रानेही कोष निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. रेशीम उत्पादनात खूप संधी असल्याने अधिकाधिक शेतक-यांनी रेशीम शेतीकडे वळावे. मनरेगाच्या माध्यमातून रेशीम उत्पादकांना तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.आ. टोपे म्हणाले की, रेशीम कोष उत्पादनाचा जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याकडे पाहिले जाते. रेशीम कोष उत्पादनासाठी शेतक-यांना प्रोत्साहित करण्याची गरज असून तंत्रज्ञानाची मदत घेऊन आधुनिक पद्धतीने रेशीम शेती केल्यास वर्षाला एकरी पाच ते सहा लाखांचे उत्पादन मिळू शकते. घनसावंगी तालुक्यातील अनेक शेतकºयांनी रेशीम उत्पादनात आघाडी घेतली आहे. अन्य शेतक-यांनी त्यांचे अनुकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले.सचिव पाटणी म्हणाले, की महारेशीम अभियानाअंतर्गत जालना येथे सुरू केलेल्या या बाजारपेठ ही या शृंखलेतील पहिले पुष्प आहे. रेशमी कपडे घालणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावे, त्यातून शेतकºयांचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. रेशीम शेती करणाºया शेतकºयांना राष्ट्रीय बाजारपेठेत खूप संधी असून, अधिकाधिक शेतक-यांनी रेशीम उत्पादनाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. जालन्यातील रेशीम विक्री बाजार पेठेमुळे परराज्यात रेशीम विक्रीस जाणाºया शेतक-यांचा त्रास कमी झाला आहे. याचा शेतकºयांना फायदा घेण्याची गरज अंबेकर यांनी व्यक्त केली. रेशीम विभागाचे सहायक संचालक दिलीप हाके यांनी प्रास्ताविक केले. बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रेशीम कोष बाजार पेठेत पहिल्या दिवशी चांगल्या प्रतिच्या रेशीम कोशाला ४७ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पहिल्याच दिवशी ३० क्विंटल रेशीम कोषची आवक झाली होती.अडथळ्यांची शर्यत दूरमनेरेगाच्या माध्यमातून तुतीची शेती करणाीºया शेतकºयांना प्रति वर्ष एक लाख रूपये म्हणून अनुदान देण्याची शासनाची योजना आहे. मात्र याचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी शेतक-यांना या चांगल्या योजनेचा फायदा घेता येत नाही. इच्छा असूनही शेतक-यांना रेशीम शेती करता येत नाही. शासनाने अडथळ्यांची शर्यत दूर करण्याची गरज टोपे यांनी व्यक्त केली.करा

टॅग्स :FarmerशेतकरीArjun Khotkarअर्जुन खोतकर