शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

भगवान गिरी यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST

खंडित वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे उकाड्याने त्रस्त ...

खंडित वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय

घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक हैराण झाले आहेत. शिवाय फळपिकांना पाणी देताना शेतकऱ्यांनाही तासन् तास विजेची वाट पाहावी लागते. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.

शहरातील नाल्यांची साफसफाई होईना

भोकरदन : नाल्यातील सफाईची कामे पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. आता पावसाळा सुरू होत असतानाही भोकरदन शहरातील नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. यावर्षीसुध्दा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असे असतानाही नगर पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

जामवाडी येथे जयंतीनिमित्त अभिवादन

जालना : जालना तालुक्यातील जामवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत वाढेकर व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुधाकर वाढेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी भाऊलाल पवार, सरपंच विजय वाढेकर, माणिक खरात, सरपंच विजय वाढेकर आदींची उपस्थिती होती.

घनसावंगी परिसरात पावसाची हजेरी

घनसावंगी : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना सोमवारी दुपारी पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. घनसावंगी परिसरात सोमवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारी एकपासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास दमदार पाऊस झाला. यामुळे शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

बदनापूर येथे जयंती साजरी

बदनापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कडेगाव येथे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी गणेश कोल्हे, हभप रामेश्वर महाराज कोल्हे, रामनारायण कोल्हे, संभाजी चांगुलपाये, विमलबाई कोल्हे, गयाबाबई जोशी, रंजना कोल्हे, सारजाबाई बकाल, कांताबाई कोल्हे, अनिता लांडे, रेणुका कोल्हे आदींची उपस्थिती होती.

विजेअभावी पाणी पुरवठा विस्कळीत

राजूर : भोकरदन तालुक्यातील बाणेगाव मध्यम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असतांना अपुरा वीजपुरवठा होत असल्याने राजूरसह १५ गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चांदई ठोंबरी रोहित्रला पाणी पुरवठ्यासाठी सलग बारा तास सुरळीत वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी होत आहे.

अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी

मंठा : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे महिला, मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय कायदा - सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे. दारूमुळे निर्माण होणाऱ्या समस्या पाहता संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पथदिवे दिवसाही सुरूच

जालना : शहरांतर्गत विविध भागातील बहुतांश पथदिवे दिवसाही सुरू राहत आहेत, तर काही भागातील पथदिवे बंद पडले आहेत. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.

कारवाईची मागणी

जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. दारुमुळे भांडण - तंट्यात वाढ होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. याचा महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असून, दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

रस्ता दुरूस्तीची गरज

जालना : शहरांतर्गत भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत असून, संबंधितांनी रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

सूचना फलक गायब

भोकरदन : तालुक्याचे ठिकाण असलेल्या भोकरदन शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात या मार्गावरील दिशादर्शक, सूचना फलक गायब झाल्याने चालकांची गैरसोय होत आहे. संबंधितांनी हे फलक बसवावेत, अशी मागणी होत आहे.

वाहन चालकांची कसरत

परतूर : शहरांतर्गत विविध भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. शिवाय अपघाताचाही धोका वाढला आहे. ही बाब पाहता नगर पालिकेने लक्ष देऊन शहरांतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.