शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

दुरुस्तीचे नाटक; एकाच दिवसात खड्डे जैसे थे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:37 IST

खड्ड््यात हरवलेल्या अग्रसेन चौक ते औरंगाबाद चौफुली रस्त्याची बांधकाम विभागाने पुन्हा डागडुजी सुरू केली आहे. मात्र, खड्डे थातूरमातूर कामामुळे सकाळी बुजविलेले खड्डे सायंकाळपर्यंत जैसे थे होत आहेत. वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खड्ड््यात हरवलेल्या अग्रसेन चौक ते औरंगाबाद चौफुली रस्त्याची बांधकाम विभागाने पुन्हा डागडुजी सुरू केली आहे. मात्र, खड्डे थातूरमातूर कामामुळे सकाळी बुजविलेले खड्डे सायंकाळपर्यंत जैसे थे होत आहेत. वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.अग्रसेन चौक ते औरंगाबाद चौफुली या मुख्य रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली असून, वाहनधारकांना खड्ड््यातून रस्ता शोधावा लागत आहे. महाकाय खड्ड्यांमुळे मोठी वाहने खिळखिळी होत आहेत. रामतीर्थ पुलाजवळ उतारावरच दोन्ही बाजूंनी खड्डे असल्याने अपघात घडत आहेत. या रस्त्यावरील दुचाकींच्या शोरूमसमोर रस्ता आहे की नाही, अशी स्थिती आहे. या रस्त्यावरील खड्ड््यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, पाण्यासारखे पातळ डांबर, मोठे दगड व खडीचा चुरा टाकून हे खड्डे बुजविले जात आहे. रस्त्याच्या मध्येच दोन ड्रम उभे करून खड्डे बुजवले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. रविवारी दुपारी रामतीर्थ पुलावर तासभर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. खड्डंयामध्ये खडीचा चुरा टाकण्याचा हा प्रकार म्हणजे पैशाचा अपव्यय असल्याचे जाणकार सांगत आहे. शहरातील नूतन वसाहत उड्डाणपूल ते अंबड चौफुली, बालाजी चौक ते नवीन मोंढा, राष्ट्रीय हिंंदी विद्यालय- कन्हैय्यानगर हे महत्त्वाच्या रस्त्यांवर शहरात येणाऱ्यांचे खड्ड््यांनीच स्वागत होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाcivic issueनागरी समस्या