शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

सत्ताधारी, विरोधकांकडून पालिकेच्या कामाचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST

नगरसेवक विजय चौधरी यांनी जिंदल मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर दुकाने बांधली असून, त्याची परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला, तसेच शिवाजी ...

नगरसेवक विजय चौधरी यांनी जिंदल मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर दुकाने बांधली असून, त्याची परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला, तसेच शिवाजी महाराज पुतळा परिसरातही परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम केले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी शाह आलमखान यांनी इन्कमटॅक्स कॉलनीतील स्टेडियमजवळ डीपी मार्ग असताना इमारत बांधकामाच्ळा परवानगीचा मुद्दा मांडून पाणी पुरवठ्याबाबात काय नियोजन केले, अशी विचारणा केली. शिवसेनेचे गटनेते विष्णू पाचफुले यांनी मंमादेवी ते रेल्वेस्थानक मार्गाची झालेली रस्त्याची चाळणी, तसेच अन्य महत्त्वपूर्ण मुद्दे मांडून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ढक्का यांनी लोखंडी पुलाला मंमादेवी पूल असे नाव देऊन प्रवेशद्वार उभारण्याची मागणी केली.

दरम्यान, नगरसेवकांनी उपस्थित केलेले अवैध बांधकाम, तसेच पार्किंगच्या मुद्याची सविस्तर चौकशी केली जाईल, असे सांगितले. यावेळी यापूर्वीही असेच आश्वासन देण्यात आल्याचे स्मरण त्यांना काही संतप्त नगरसेवकांनी करून दिल्याचे दिसून आले. अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रात आता जालना पालिकेकडून एक मेगावॅटची सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी महात्मा फुले मार्केटची उभारणी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच यात जुन्या व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी नगरसेवक शशिकांत घुगे, अरुण मगरे, रामेश्वर ढोबळे, रमेश गौरक्षक, विजय पवार, फारुक तुंडीवाले, आमेर पाशा, जयंत भोसले, विजय पांगारकर आदींची उपस्थिती होती. यावेळी विषय पत्रिकेवरील ३३ विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेला पालिकेचे अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांचीही उपस्थिती होती.

चौकट

महिलांनी मांडले प्रश्न

आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका रुबिना खान, रफियाबेगम, संध्या देठे, पूनम स्वामी, वैशाली जांगडे यांनीदेखील त्यांच्या प्रभागातील मुद्दे मांडले. स्वामी यांनी आपल्या गेल्या वर्षभराच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न नमूद केले. या सर्व प्रश्नांना नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी अत्यंत संयमाने आणि अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. नगरसेवकांनी त्यांचे मुद्दे लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली. त्या सर्व मुद्यांची उत्तरे त्यांना देण्यात येतील, असे सांगून गोंधळ न घालण्याचे आवाहन केले होते.