शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी, विरोधकांकडून पालिकेच्या कामाचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST

नगरसेवक विजय चौधरी यांनी जिंदल मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर दुकाने बांधली असून, त्याची परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला, तसेच शिवाजी ...

नगरसेवक विजय चौधरी यांनी जिंदल मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर दुकाने बांधली असून, त्याची परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला, तसेच शिवाजी महाराज पुतळा परिसरातही परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम केले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी शाह आलमखान यांनी इन्कमटॅक्स कॉलनीतील स्टेडियमजवळ डीपी मार्ग असताना इमारत बांधकामाच्ळा परवानगीचा मुद्दा मांडून पाणी पुरवठ्याबाबात काय नियोजन केले, अशी विचारणा केली. शिवसेनेचे गटनेते विष्णू पाचफुले यांनी मंमादेवी ते रेल्वेस्थानक मार्गाची झालेली रस्त्याची चाळणी, तसेच अन्य महत्त्वपूर्ण मुद्दे मांडून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ढक्का यांनी लोखंडी पुलाला मंमादेवी पूल असे नाव देऊन प्रवेशद्वार उभारण्याची मागणी केली.

दरम्यान, नगरसेवकांनी उपस्थित केलेले अवैध बांधकाम, तसेच पार्किंगच्या मुद्याची सविस्तर चौकशी केली जाईल, असे सांगितले. यावेळी यापूर्वीही असेच आश्वासन देण्यात आल्याचे स्मरण त्यांना काही संतप्त नगरसेवकांनी करून दिल्याचे दिसून आले. अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रात आता जालना पालिकेकडून एक मेगावॅटची सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी महात्मा फुले मार्केटची उभारणी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच यात जुन्या व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी नगरसेवक शशिकांत घुगे, अरुण मगरे, रामेश्वर ढोबळे, रमेश गौरक्षक, विजय पवार, फारुक तुंडीवाले, आमेर पाशा, जयंत भोसले, विजय पांगारकर आदींची उपस्थिती होती. यावेळी विषय पत्रिकेवरील ३३ विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेला पालिकेचे अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांचीही उपस्थिती होती.

चौकट

महिलांनी मांडले प्रश्न

आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका रुबिना खान, रफियाबेगम, संध्या देठे, पूनम स्वामी, वैशाली जांगडे यांनीदेखील त्यांच्या प्रभागातील मुद्दे मांडले. स्वामी यांनी आपल्या गेल्या वर्षभराच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न नमूद केले. या सर्व प्रश्नांना नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी अत्यंत संयमाने आणि अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. नगरसेवकांनी त्यांचे मुद्दे लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली. त्या सर्व मुद्यांची उत्तरे त्यांना देण्यात येतील, असे सांगून गोंधळ न घालण्याचे आवाहन केले होते.