शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नोकरभरती थांबवावी, अन्यथा गावागावात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

जालना : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्य सरकार भरती काढत आहेत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार ...

जालना : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्य सरकार भरती काढत आहेत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार आहे. यावर मराठा मंत्री मूग गिळून गप्प आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साडेसतरा हजार पदांची भरती आरोग्य खात्यात काढली आहे. ही भरती त्यांनी थांबवावी नाही तर गावागावात एल्गार मेळावे घेण्यात येतील, असा इशारा आ. विनायक मेटे यांनी बोलताना दिला.

जालना येथे रविवारी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठा एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजन घाग, सुभाष जावळे, सुदर्शन धांडे, सुनील कोतकर, उदय आहेर, प्रा. प्रशांत गोळे, सचिन मिसाळ, प्रा. लक्ष्मण नवले, नीलेश गोर्डे, नारायण टकले, ॲड. लक्ष्मण उढाण, श्याम उढाण, सचिन बळीराम शेळके, विराज जोगदंड, किशोर चव्हाण, उमेश बर्वे, मनोज वाटाणे आदींची उपस्थिती होती.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेले मराठा समाजाचे आरक्षण आणि राज्य सरकारकडून होत असलेला चालढकलपणा याचा आ. विनायक मेटे यांनी खरपूस समाचार घेतला. मराठ्यांसोबत घाट घालाल तर तुम्हाला घाटावर पोहोचवू, असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला.

मंत्री अशोक चव्हाण यांच्या तोंडाला सध्या कुलूप लावलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात देखील मराठा समाजाबद्दल पाप आहे का, हे शोधण्याची वेळ आली आहे. मराठा समाजाचे आरक्षण टिकवणे हे राज्य सरकारच्या हातात आहे; परंतु राज्य सरकार तारीख पे तारीख देत सुटले आहे. मराठा समाजाच्या मुलांच्या भविष्यावर नांगर फिरवणार असाल तर तुमचे महाल सुरक्षित राहणार नाहीत. असे म्हणत १ एप्रिलपर्यंत राज्यातील सर्व नोकर भरती पुढे ढकला अन्यथा दिल्लीतील शेतकऱ्यांसारखे आंदोलन करू, असा इशारा आ. मेटे यांनी दिला.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिवसंग्रामचे नीलेश गोर्डे, प्रशांत गोले, प्रा. लक्ष्मण नवले, नारायण टकले यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

..........

चौकट

शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा

राज्य सरकारने मराठा समाजास झोपेत असताना धोंडा घालण्याचे काम करू नये. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी याबाबत पुढाकार घेऊन एक बैठक घ्यावी आणि मराठा आरक्षणासंबंधीचा निर्णय सकल मराठा समाजाला सांगावा, असे आवाहनदेखील विनायक मेटे यांनी केले.