शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

नोकरभरती थांबवावी, अन्यथा गावागावात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

जालना : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्य सरकार भरती काढत आहेत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार ...

जालना : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्य सरकार भरती काढत आहेत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार आहे. यावर मराठा मंत्री मूग गिळून गप्प आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साडेसतरा हजार पदांची भरती आरोग्य खात्यात काढली आहे. ही भरती त्यांनी थांबवावी नाही तर गावागावात एल्गार मेळावे घेण्यात येतील, असा इशारा आ. विनायक मेटे यांनी बोलताना दिला.

जालना येथे रविवारी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठा एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजन घाग, सुभाष जावळे, सुदर्शन धांडे, सुनील कोतकर, उदय आहेर, प्रा. प्रशांत गोळे, सचिन मिसाळ, प्रा. लक्ष्मण नवले, नीलेश गोर्डे, नारायण टकले, ॲड. लक्ष्मण उढाण, श्याम उढाण, सचिन बळीराम शेळके, विराज जोगदंड, किशोर चव्हाण, उमेश बर्वे, मनोज वाटाणे आदींची उपस्थिती होती.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेले मराठा समाजाचे आरक्षण आणि राज्य सरकारकडून होत असलेला चालढकलपणा याचा आ. विनायक मेटे यांनी खरपूस समाचार घेतला. मराठ्यांसोबत घाट घालाल तर तुम्हाला घाटावर पोहोचवू, असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला.

मंत्री अशोक चव्हाण यांच्या तोंडाला सध्या कुलूप लावलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात देखील मराठा समाजाबद्दल पाप आहे का, हे शोधण्याची वेळ आली आहे. मराठा समाजाचे आरक्षण टिकवणे हे राज्य सरकारच्या हातात आहे; परंतु राज्य सरकार तारीख पे तारीख देत सुटले आहे. मराठा समाजाच्या मुलांच्या भविष्यावर नांगर फिरवणार असाल तर तुमचे महाल सुरक्षित राहणार नाहीत. असे म्हणत १ एप्रिलपर्यंत राज्यातील सर्व नोकर भरती पुढे ढकला अन्यथा दिल्लीतील शेतकऱ्यांसारखे आंदोलन करू, असा इशारा आ. मेटे यांनी दिला.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिवसंग्रामचे नीलेश गोर्डे, प्रशांत गोले, प्रा. लक्ष्मण नवले, नारायण टकले यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

..........

चौकट

शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा

राज्य सरकारने मराठा समाजास झोपेत असताना धोंडा घालण्याचे काम करू नये. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी याबाबत पुढाकार घेऊन एक बैठक घ्यावी आणि मराठा आरक्षणासंबंधीचा निर्णय सकल मराठा समाजाला सांगावा, असे आवाहनदेखील विनायक मेटे यांनी केले.