शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

कापसाची यंदा विक्रमी ६० लाख क्विंटलची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:30 IST

जालना : यंदा जून महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रथमच जूनमध्ये कपाशीसह अन्य पिकांची पेरणी केली होती. त्याचे ...

जालना : यंदा जून महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रथमच जूनमध्ये कपाशीसह अन्य पिकांची पेरणी केली होती. त्याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. परतीच्या पावसाचा फटका बसला नसता तर, आजच्यापेक्षा कापसाचे अधिक उत्पादन झाले असते. गेल्यावर्षीचा विचार केल्यास आजच्या तारखेपर्यंत कापूस उत्पादक जिल्ह्यात केवळ १८ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली होती. ती यंदा तब्बल ६० लाख क्विंटलवर पोहोचली आहे. कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्याने यंदा ३० सप्टेंबरपर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार आहे.

कापूस उत्पादनात आघाडीवर असलेले विदर्भातील दहा आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एकट्या जालना जिल्ह्याचा विचार केल्यास गेल्या हंगामात चार लाख २१ हजार क्विंटल एवढीच खरेदी झाली होती. तीच खरेदी यंदा सहा लाख क्विंटलवर पोहोचली आहे.

यंदा सीसीआयने कापूस खरेदीसाठी ८८ खरेदी केंद्र सुरू केले होते. आजघडीला त्यांच्याकडे कापूस साठविण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याने जास्तीत जास्त जिनिंगचालकांशी संपर्क करून त्यांच्याकडे सूत काढण्यासाठी तसेच कपाशीच्या गाठी तयार करण्यासाठी दिला जात आहे. संपूर्ण राज्याचा विचार केला असता, शंभरपेक्षा अधिक खाजगी जिनिंग आहेत. त्यात काही ठिकाणी कापसापासून धागा निर्मितीदेखील केली जाते. सध्या सीसीआयकडून कापसाला हमीभाव म्हणून पाच हजार ७०० रुपयांचा दर प्रतिक्विंटलला मिळत असल्याने आजपर्यंत सरासरी या दराने ६० लाख कापूस खरेदीची किंमत ही तीन हजार कोटी रुपयांच्या घरात जात असल्याचे सांगण्यात आले.

चौकट

सुती धाग्याला मिळाला ऐतिहासिक भाव

कापसापासून धागानिर्मिती उद्योगाला यंदा कोरोनानंतर चांगले दिवस आले ओहत. कधी नव्हे, तो सुती धगाा ३०० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत असल्याचे सांगण्यात आले. यंदा जिनिंग उद्योगाने कात टाकली असून, सीसीआयकडून सूतनिर्मिती आणि गठाण तयार करण्यासाठी कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने हा उद्योग यंदा तेजीत आहे.

संजय राठी, संचालक काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेक्सप्रोसिल