शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कर्जमाफीसाठी ४५५ कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:05 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून जिल्ह्याला ४५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आलेला निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७० हजार ११८ पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजालना : लाभार्थींना रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू

जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून जिल्ह्याला ४५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आलेला निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७० हजार ११८ पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे. तशा आशयाचा संदेशही बँकांकडून लाभार्थ्यांना पाठवला जात आहे. लाभार्थी शेतकºयांचा आकडा वाढणार असून, त्या प्रमाणात निधीही बँकांना मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यशासनाने पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरुवात केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख पंधरा हजार कुटुंबातील तीन लाख ९७ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले होते. अर्ज भरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या तयार करून त्याचे चावडी वाचन पूर्ण करण्यात आले. बँकांनाही आपल्याकडील कृषी कर्जदार शेतकºयांची संपूर्ण माहिती आॅनलाइन भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी तीन लाख १२ हजार शेतकºयांची माहिती महा वेबपोर्टलवर भरली आहे. आॅनलाइन भरलेले अर्ज आणि बँकांनी कर्जदार शेतकºयांची आॅनलाइन भरलेली माहिती याचे आधारकार्ड, खाते क्रमांक व अन्य माहितीच्या आधारे संगणकाद्वारे अ‍ॅटो पद्धतीने एकत्रिकरण करून संगणकाद्वारे सॉफ्टवेअरच्या साहाय्याने हिरवा, पिवळा आणि लाल अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या. हिरव्या यादीत कर्जमाफीस तात्पुरते पात्र, पिवळ्या यादीत अर्ज भरताना कागदपत्रातील त्रुटींमुळे प्रलंबित शेतकºयांची नावे, तर लाल यादीत कर्जमाफीस तात्पुरते अपात्र शेतकºयांची नावे आहेत. याद्या अपडेट करताना बँक प्रशासनाचीही दमछाक झाली होती. प्रत्यक्षात महिनाभरात पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात केली होती. कागदपत्रांची जमावजमव आणि आॅनलाईन अपग्रेडेशन यामुळे अडचणीत भर पडली. परिणामी दोन महिने या प्रक्रियेस लागले. आता कर्जमाफीची प्रक्रिया सुरु झाली असून, दोन टप्प्यांत राज्य शासनाने ४५५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी थेट बँकांना दिला आहे. टप्प्याटप्प्याने पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे.