शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी ४५५ कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:05 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून जिल्ह्याला ४५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आलेला निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७० हजार ११८ पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजालना : लाभार्थींना रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू

जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून जिल्ह्याला ४५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आलेला निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७० हजार ११८ पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे. तशा आशयाचा संदेशही बँकांकडून लाभार्थ्यांना पाठवला जात आहे. लाभार्थी शेतकºयांचा आकडा वाढणार असून, त्या प्रमाणात निधीही बँकांना मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यशासनाने पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरुवात केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख पंधरा हजार कुटुंबातील तीन लाख ९७ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले होते. अर्ज भरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या तयार करून त्याचे चावडी वाचन पूर्ण करण्यात आले. बँकांनाही आपल्याकडील कृषी कर्जदार शेतकºयांची संपूर्ण माहिती आॅनलाइन भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी तीन लाख १२ हजार शेतकºयांची माहिती महा वेबपोर्टलवर भरली आहे. आॅनलाइन भरलेले अर्ज आणि बँकांनी कर्जदार शेतकºयांची आॅनलाइन भरलेली माहिती याचे आधारकार्ड, खाते क्रमांक व अन्य माहितीच्या आधारे संगणकाद्वारे अ‍ॅटो पद्धतीने एकत्रिकरण करून संगणकाद्वारे सॉफ्टवेअरच्या साहाय्याने हिरवा, पिवळा आणि लाल अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या. हिरव्या यादीत कर्जमाफीस तात्पुरते पात्र, पिवळ्या यादीत अर्ज भरताना कागदपत्रातील त्रुटींमुळे प्रलंबित शेतकºयांची नावे, तर लाल यादीत कर्जमाफीस तात्पुरते अपात्र शेतकºयांची नावे आहेत. याद्या अपडेट करताना बँक प्रशासनाचीही दमछाक झाली होती. प्रत्यक्षात महिनाभरात पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात केली होती. कागदपत्रांची जमावजमव आणि आॅनलाईन अपग्रेडेशन यामुळे अडचणीत भर पडली. परिणामी दोन महिने या प्रक्रियेस लागले. आता कर्जमाफीची प्रक्रिया सुरु झाली असून, दोन टप्प्यांत राज्य शासनाने ४५५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी थेट बँकांना दिला आहे. टप्प्याटप्प्याने पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे.