शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सायकलवारीने दोन दिवसांत ३२० किमी पार करत गाठले पंढरपूर; व्यापाऱ्याने दिला पर्यावरणाचा संदेश

By महेश गायकवाड  | Updated: June 13, 2023 14:38 IST

सायकलिस्ट फाउंडेशनच्यावतीने छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर ही ३२० किलोमीटरची सायकल वारी आयोजित करण्यात आली होती

- नसीम शेख

टेंभुर्णी ( जालना) : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील व्यावसायिक पंडित सुरशे यांनी दोन दिवसांत सायकलवर ३२० किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर गाठले. छत्रपती संभाजीनगर येथील सायकलिस्ट फाउंडेशनच्यावतीने छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर ही ३२० किलोमीटरची सायकल वारी आयोजित करण्यात आली होती. यात सुरशे हे टेंभुर्णी येथून सहभागी झाले होते. सुरशे यांनी मित्रांसोबत जालना ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवासही सायकलनेच पूर्ण केला. त्यामुळे त्यांनी जवळपास ३७५ किलोमीटरचा प्रवास सायकलवर पूर्ण केला.

पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदूषणरहीत पर्यावरणासाठी सायकलचा वापर वाढवणे काळाची गरज बनली आहे. हाच संदेश सांगत सुरशे व त्यांच्या संपूर्ण ग्रुपने ठीकठिकाणी सायकलीचे महत्त्व विशद केले. त्यांनी छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर हे ३२० कि.मी.चे अंतर अवघ्या दोन दिवसांत पूर्ण केले. आषाढी एकादशीपूर्वीच यानिमित्ताने विठुरायाचे दर्शन घडल्याने मनस्वी समाधानी असल्याचे सुरेश यांनी सांगितले. यावेळी आपल्या सोबत ७५ ते ८० वर्षाचे आजोबाही या रॅलीत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

या सायकल वारीत जालना येथून धनसिंग बहुरे, प्रशांत भाले, मिलिंद खेरुडकर, अनिल मालपाणी, काशिनाथ मोरे, किशन जाधव आदी सहभागी झाले होते. दरम्यान, पंडित सुरशे हे सोमवारी टेंभुर्णीत परतल्यानंतर त्यांचा येथील मॉर्निंग ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. दीपक नागरे, डॉ. पवन वऱ्हाडे, डॉ. अविनाश सुरुशे, डॉ. रमेश मोठे, धीरज काबरा, मनीष सोमाणी, राजू करवंदे, सर्जेराव कुमकर, संदीप विसपुते आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीJalanaजालना