शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आवक घटल्याने आंब्याचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:49 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्यांची आवक घटली आहे. परिणामी आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अक्षय्य तृतीयेला आंब्याची चव चाखणे सर्वसामान्यांना अवघड झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्यांची आवक घटली आहे. परिणामी आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अक्षय्य तृतीयेला आंब्याची चव चाखणे सर्वसामान्यांना अवघड झाले आहे.बेमोसमी हवामान आणि अवकाळी पावसामुळे फळाचा राजा असलेल्या आंब्याचा पिकाला चांगला फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाल्याने परिणामी बाजारात येणारा आंबा एक महिना उशिराने बाजारात दाखल झाला आहे. आंबा बाजारात येण्याची सुरूवातच असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी बंगळुरू, निजामाबाद, राजकोट, रायगड इ. ठिकाणांवरून लालबाग, हापूस, दसरी, केसर इ. आंब्यांची ४०० क्विंटल आवक झाली आहे. आंबा मोहरालाच असताना अवकाळी वारा वादळ आणि पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. परिणामी, गेल्या वर्षी याच महिन्यात आंब्याला ६० ते ७० टक्के मागणी होती. ती निम्म्यावर आली आहे. बाजारात आब्यांची आवक कमी असल्याने आंब्यांचे दर गगनाला भिडले आहेत. हापूस ४०० ते ५०० रूपये डझन, केसर १२० ते १५०, दसेरी ९० ते ११० लालबाग ९० ते १०० या भावाने विकला जात आहे. मात्र हेच दर गेल्या वर्षी अर्ध्यावर किमतीवर असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली. मात्र भाव जास्त असल्याने अनेकांनी आंबा खरेदीकडे कानाडोळा केला. मात्र अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याचे दर वाढूनही अनेकांनी पूजेसाठी आंब्यांची खरेदी करावी लागली.

टॅग्स :MangoआंबाMarketबाजार