शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

प्रदेशाध्यक्षांची गोपनीय बैठकीतून निवडणुकीची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:35 IST

: लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या प्रमुख निवडक पदाधिकाऱ्यांची राजूर येथे बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या प्रमुख निवडक पदाधिकाऱ्यांची राजूर येथे बैठक घेतली. त्यात आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात मंथन करण्यासह प्राथमिक व्यूहरचना निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.राजूर येथे रविवारी एका मंगलकार्यालयाच्या लॉन्सवर ही बैठक पार पडली. ही बैठक तब्बल तीन ते सोडेतीन तास चालली. यावेळी भविष्यात शिवसेने सोबत युती झाली तरी ठीक नसता, स्वबळावर लढल्यानंतर विरोधकास नामोहरम करण्यासाठी कोणकोणत्या मुद्यांचा आधार घ्यायाचा याचा कानमंत्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उपस्थितांना दिला. एकूणच या बैठकीत निवडक आणि विश्वासू पदाधिका-यांना निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीदरम्यान सर्वांचे मोबाईल स्विचआॅफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अंत्यत शिस्तबध्द पध्दतीने एक, एक विषय घेऊन त्यावर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जालना लोकसभा मतदार संघात खा.दानवे हे १९९९ पासून लोकसभेवर निवडून जात आहेत. १९९९ मध्ये त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कृषीभूषण विजयअण्णा बोराडे तर काँग्रेसकडून जि.प.चे माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर हे होते. त्यावेळी दानवे यांनी विजय मिळवला.२००४ साली भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उत्तमसिंग पवार यांच्यात थेट लढत झाली. दानवेंनी त्यांचाही पराभव केला. २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात आ. कल्याण काळे हे होते. त्यांनी दानवे यांना चांगलाच घाम फोडला होता. त्यावेळी दानवे हे केवळ साडेआठ हजार मतांनी विजयी झाले होते. २०१४ मध्ये दानवेंच्या विरोधात औरंगाबाद येथील काँग्रेसचे नेते कल्याणराव औताडे यांनी लढत दिली. मात्र, मोदी लाटेत दानवे हे तब्बल अडीच लाख मतांनी विजयी झाले.या चारही निवडणुकीत शिवसेने सोबत भाजपची युती होती, हे विसरून चालणार नाही. त्यावेळी कोणी काम केले आणि कोणी केले नाही, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. आता मात्र, राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे. शिवसेनेने स्वबळावर निवडणुक लढवण्याची डरकाळी फोडली आहे. त्यामुळे भाजप सतर्क न झाल्यास नवल. त्या दृष्टीने रविवारच्या बैठकीला राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र समजू शकले नाहीयुती होवो अथवा न होवोआगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेने सोबत युती झाली तरी ठिक आणि न झाली तरी आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. आपल्या समोर काँग्रेस आणि शिवसेना या दोन्हींचे आव्हान लक्षात घेवून राजकीयपक्ष म्हणून आम्ही तयारीला लागलो आहोत. निवडणुका या नियोजन करूनच लढवाव्या लागातत, त्यामुळे आजची बैठक बोलावली होती. त्यात आम्ही काय करणार याची प्राथमिक चाचपणी करण्याचा प्रयत्न या बैठकीतून केला आहे.- रावसाहेब दानवे, खा. तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेPoliticsराजकारण