शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अडथळ्यांवर मात करीत रावसाहेब दानवेंचा विक्रमी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 18:00 IST

काँग्रेसला जिवंत ठेवण्यासाठी कैलास गोरंट्याल यांची जालन्यात एकाकी झुंज 

ठळक मुद्देरावसाहेब दानवे विजयी रथावर सलग पाचव्यांदा स्वारधडाडीचा एकही नेता शिल्लक नसल्याने काँग्रेस गर्भगळीत

- संजय देशमुख

जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा विजय तेव्हाच निश्चित मानला गेला, ज्यावेळी काँग्रेसमध्ये उमेदवारी कोणाला द्यावी यावरून खल सुरू होता. कोणीच नेता दानवेंच्या विरोधात दोन हात करण्यास तयार नव्हता. ऐनवेळी २०१४ मध्ये पराभव पत्काराव्या लागणाऱ्या विलास औताडेंच्या गळ्यात उमेदवारी मारण्यात आली. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून दानवेंना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यात अपयशी ठरले. दानवेंचा विजय एवढ्या मोठ्या मताधिक्याने झाल्याने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. वाटेतील सर्व अडथळे खुबीने दूर करून दानवे विजयी रथावर सलग पाचव्यांदा स्वार झाले. 

जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला स्व. खा. बाळासाहेब पवार यांच्यानंतर खमक्या नेताच मिळाला नाही. एकवेळेस स्व. अंकुशराव टोपे यांनी विजय मिळवून काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न केले. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि टोपे पिता-पुत्र राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे काँग्रेसची जिल्ह्यात शकले उडाली. धडाडीचा एकही नेता त्यांच्याकडे शिल्लक नसल्याने आज काँग्रेस गर्भगळीत झाली आहे. माजी आ. कैलास गोरंट्याल हे अल्पसंख्याक समाजाचे असतानाही ते त्यांच्या बळावर जालन्यात काँग्रेसला जिवंत ठेवत आहेत. एकूणच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे प्रस्थ वाढल्याने आणि त्यांनी गेल्या पाच वर्षांत विकास कामे आणि संघटनात्मकबांधणी केली. त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळाले. दानवेंच्या पराभवासाठी केंद्र आणि राज्यातील शेतकरी विरोधी धोरण तसेच दानवेंचे शेतकरी विरोधी वक्तव्य हे त्यांना मारक ठरतील, असे वाटले होते. परंतु नागरिकांना पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा मोदीच हवे होते, त्याचा परिणामही दानवेंचे मताधिक्य वाढण्यावर झाला. लोकसभेत युतीला मिळालेल्या यशामुळे आता पाच महिन्यांनी येणाऱ्या विधासभेतही हेच चित्र राहते की, त्यात बदल होतो, हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.

खोतकरांचे बंड  थोपविण्यात यशमध्यतरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचे मनसुभे बांधले होते. परंतु दानवे यांनी खोतकरांचे बंड थोपविण्याचे काम थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सोपवले होते. ती त्यांनी यशस्वी केली.

स्कोअर बोर्डखा. रावसाहेब दानवे यांनी ६ लाख ९८ हजार ४९ अशी घसघशीत मते मिळवीत सलग पाचवा विजय नोंदविला. त्यांनी गेल्यावेळच्या निवडणक ीत दोन लाख ६ हजारांचे मताधिक्य घेतले होते. यंदा ते वाढून ३ लाख ३२ हजार ८१५ इतके झाले. काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यांना ३ लाख ६५ हजार १२४ मते मिळाली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे ७७ हजार १५८ मते मिळवीत तिसऱ्या स्थानावर राहिले. 

टॅग्स :jalna-pcजालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल