शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

अडथळ्यांवर मात करीत रावसाहेब दानवेंचा विक्रमी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 18:00 IST

काँग्रेसला जिवंत ठेवण्यासाठी कैलास गोरंट्याल यांची जालन्यात एकाकी झुंज 

ठळक मुद्देरावसाहेब दानवे विजयी रथावर सलग पाचव्यांदा स्वारधडाडीचा एकही नेता शिल्लक नसल्याने काँग्रेस गर्भगळीत

- संजय देशमुख

जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा विजय तेव्हाच निश्चित मानला गेला, ज्यावेळी काँग्रेसमध्ये उमेदवारी कोणाला द्यावी यावरून खल सुरू होता. कोणीच नेता दानवेंच्या विरोधात दोन हात करण्यास तयार नव्हता. ऐनवेळी २०१४ मध्ये पराभव पत्काराव्या लागणाऱ्या विलास औताडेंच्या गळ्यात उमेदवारी मारण्यात आली. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून दानवेंना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यात अपयशी ठरले. दानवेंचा विजय एवढ्या मोठ्या मताधिक्याने झाल्याने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. वाटेतील सर्व अडथळे खुबीने दूर करून दानवे विजयी रथावर सलग पाचव्यांदा स्वार झाले. 

जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला स्व. खा. बाळासाहेब पवार यांच्यानंतर खमक्या नेताच मिळाला नाही. एकवेळेस स्व. अंकुशराव टोपे यांनी विजय मिळवून काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न केले. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि टोपे पिता-पुत्र राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे काँग्रेसची जिल्ह्यात शकले उडाली. धडाडीचा एकही नेता त्यांच्याकडे शिल्लक नसल्याने आज काँग्रेस गर्भगळीत झाली आहे. माजी आ. कैलास गोरंट्याल हे अल्पसंख्याक समाजाचे असतानाही ते त्यांच्या बळावर जालन्यात काँग्रेसला जिवंत ठेवत आहेत. एकूणच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे प्रस्थ वाढल्याने आणि त्यांनी गेल्या पाच वर्षांत विकास कामे आणि संघटनात्मकबांधणी केली. त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळाले. दानवेंच्या पराभवासाठी केंद्र आणि राज्यातील शेतकरी विरोधी धोरण तसेच दानवेंचे शेतकरी विरोधी वक्तव्य हे त्यांना मारक ठरतील, असे वाटले होते. परंतु नागरिकांना पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा मोदीच हवे होते, त्याचा परिणामही दानवेंचे मताधिक्य वाढण्यावर झाला. लोकसभेत युतीला मिळालेल्या यशामुळे आता पाच महिन्यांनी येणाऱ्या विधासभेतही हेच चित्र राहते की, त्यात बदल होतो, हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.

खोतकरांचे बंड  थोपविण्यात यशमध्यतरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचे मनसुभे बांधले होते. परंतु दानवे यांनी खोतकरांचे बंड थोपविण्याचे काम थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सोपवले होते. ती त्यांनी यशस्वी केली.

स्कोअर बोर्डखा. रावसाहेब दानवे यांनी ६ लाख ९८ हजार ४९ अशी घसघशीत मते मिळवीत सलग पाचवा विजय नोंदविला. त्यांनी गेल्यावेळच्या निवडणक ीत दोन लाख ६ हजारांचे मताधिक्य घेतले होते. यंदा ते वाढून ३ लाख ३२ हजार ८१५ इतके झाले. काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यांना ३ लाख ६५ हजार १२४ मते मिळाली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे ७७ हजार १५८ मते मिळवीत तिसऱ्या स्थानावर राहिले. 

टॅग्स :jalna-pcजालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल