शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

राजुरेश्वर मंदिराला पर्यटन स्थळाचा "अ" वर्ग दर्जा प्राप्त; २० एकरात उभारणार कृषी पर्यटन क्षेत्र

By विजय मुंडे  | Updated: June 19, 2024 19:51 IST

शासनाने एका वर्षात राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणारी ७० ते ८० लाख भाविकांची संख्या तसेच परदेशातून येणारे भाविक लक्षात घेवून अ वर्ग दर्जा दिला

जालना / राजूर : मराठवाडयातील प्रसिद्ध देवस्थान राजूर (ता.भोकरदन जि.जालना) येथील श्री राजुरेश्वर मंदिराला राज्य शासनाकडून पर्यटन स्थळाचा "अ" वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे. देवस्थानला अ वर्ग दर्जा मिळाल्याने विकास कामाला चालना मिळणार आहे. राजूर भागातच २० एकरवर कृषी पर्यटन केंद्रही उभारले जाणार असल्याची माहिती माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

श्री गणपती संस्थानने गेल्या दोन वर्षापूर्वी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून राजुरेश्वर संस्थानला अ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती. यासाठी रावसाहेब दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने एका वर्षात राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणारी ७० ते ८० लाख भाविकांची संख्या तसेच परदेशातून येणारे भाविक लक्षात घेवून अ वर्ग दर्जा दिला असून, त्याचा अध्यादेश पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने बुधवारी १९ जून रोजी काढला आहे. राजुरेश्वर मंदिराला ऐतिहासिक व पुरातत्विय पार्श्वभूमी आहे. मंदिराला अ वर्गाचा दर्जा मिळाल्याने स्थानिक भाविक व परदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध होणार असल्याने विकास कामाला चालना मिळणार आहे. पर्यायाने आर्थिक उलाढालीत वाढ होवून राजूरच्या वैभवात भर पडणार आहे. दरम्यान, याच परिसरात २० एकरात कृषी पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे. शेतकरी, विद्यार्थ्यांच्या सहली होणार असून, शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तेथे मुलांसाठी मनोरंजनाचे साहित्य, वाचनालय राहणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.

संस्थानला मिळणाऱ्या निधीत वाढ गेल्या दोन वर्षापूर्वी श्री गणपती संस्थानने शासनाकडे मंदिराला पर्यटनस्थळाचा अ वर्गात समावेश करण्याची मागणी केली होती. यासाठी माजी केंद्रिय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मेाठे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याने संस्थानला मिळणाऱ्या निधीत वाढ होणार असून, विकास कामाला चालना मिळणार आहे.- गणेश साबळे, व्यवस्थापक, श्री गणपती संस्थान राजूर

राजूरचे नांव आता जगाच्या नकाशावरराजुरेश्वर मंदिराला अ वर्ग दर्जा मिळाल्याने राजूरचे नांव आता जगाच्या नकाशावर आले आहे. ही राजूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. शासनाकडून गणपती संस्थानला मेल मिळाला आहे.- प्रशांत दानवे, कार्यालयीन अधीक्षक गणपती संस्थान राजूर

 

टॅग्स :Jalanaजालनाspiritualअध्यात्मिकtourismपर्यटन