शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

तोतया महिला उभी करून, जमीनीचा मावेजा लाटण्याचा प्रकार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:37 IST

जालना शहरातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गात संपादीत जमीनीची रजिस्ट्री करताना बनावट मालकिन उभी करून ६३ लाख रूपयांचा मावेजा उलण्यासाठीचा हा खटाटोप समोर आला आहे.

ठळक मुद्देसमृध्दी महामार्गात भूखंड घोटाळा : चौकशी झाल्यास अनेक प्रकरणे येणार उघडकीस

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गात संपादीत जमीनीची रजिस्ट्री करताना बनावट मालकिन उभी करून ६३ लाख रूपयांचा मावेजा उलण्यासाठीचा हा खटाटोप समोर आला आहे. मात्र, पोलीसांकडे ही तक्रार आल्यानंतर चौकशी केल्यावर यातील तथ्य आज तरी पुढे आले आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील रहिवासी -हल्ली मुक्कम औरंगाबादेतील तक्रारदार शरीफा बेगम मोहंमद अब्दुल गणी यांनी तक्रार दिली आहे.या संदर्भात पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, जालना शहराजवळून मुंबई ते नागपूर हा महामार्ग जात आहे. या महार्गासाठी जमीन संपादन करताना अनेक चुकीच्या पध्दतीने जमिनीचे संपादन झाल आहे. या प्रकरणी अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. असे असताना प्रशासानाकडून मात्र, याचा इन्कार केला जात होता. परंतु आज यातील तथ्य समोर आले असून,आज दाखल झालेला हा गुन्हा म्हणजे हिमनगाचे एक टोक असून, जालन्यात समृध्दी महामार्गासाठी जमीन संपादनाची चौकशी झाल्यास मोठा घोटाळा समोर येऊ शकतो. असे सांगण्यात आले.या प्रकरणाचा तपास कदीम जालना पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार के.एस. मीमरोट हे करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.या प्रकरणात दोन आरोपी असून, ते सध्या फरार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणा सारखेच आणखी एक प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता असून, जवळपास ९० लाख रूपयांचे ते प्रकरण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणाचीही उच्च स्तरावरून चौकशी सुरू आहे.पानशेंद्रा येथील गट क्रमांक ४१ मध्ये शरीफा बेगम मोहंमद अब्दुल गणी यांची जवळपास चार एकर सहा गुंठे शेतजमिन आहे. ही जमिन समृध्दी महामार्गासाठी संपादीत झाली आहे. परंतु ही जमीन संपादन करताना अंबड येथील दुय्ययम निबंधक कार्यालयात एक चुकीच्या पध्दतीने जीपीओ- अर्थात कुलमुक्त्यार पत्र तयार केले गेले. त्या आधारे भोकरदन येथेही एका जमीनी संदर्भात हेच रेकॉर्ड उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.सदरील बनावट मालकिण असणारी ही महिलाही मुस्लिम समाजातील दर्शविण्यात आल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे.सदरील महिलेचे केवळ मतदान कार्ड दाखवून हा जीपीओ तयार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी झालेल्या चौकशीत पुढे आले आहे.महसूल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी तसेच अन्य अधिकाऱ्यांची दिशाभूल करून हा समृध्दीचा मावेजा लाटण्याचे षडयंत्र होते.परंतु कदीम जालना पोलीस ठाण्यात हे प्रकरण दाखल होताच पोलीसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे संपर्क करून ६३ लाख रूपयांचा मावेजा न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :JalanaजालनाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग