शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

राजकीय फायद्यासाठी जातीय विषमता निर्माण केली जातेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

वडीगोद्री : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांचे नेतृत्व करावं अशी इच्छा छत्रपती शाहू महाराज व्यक्त करत असत. तर माझी ...

वडीगोद्री : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांचे नेतृत्व करावं अशी इच्छा छत्रपती शाहू महाराज व्यक्त करत असत. तर माझी जयंती साजरी करू नका परंतु आपल्याला आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांची जयंती साजरी करावी, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर करत असत. महाराष्ट्रात असा जातीय एकोपा होता. अलीकडे मात्र ठराविक राजकीय नेते त्यांच्या राजकीय फायद्यासाठी मुद्दामहून जातीय विषमता निर्माण करतात, असा घणाघाती आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी केला.

अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी रात्री छत्रपती संभाजीराजे यांनी भेट देवून पाठींबा दिला. आपले पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांनी फक्त मराठ्यांचं राजकारण केला असतं तर काय झालं असतं. मात्र त्यांनी तसे केले नाही. अठरापगड जातींना व बारा बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. शाहू महाराजांनी करवीर संस्थानात १९०२ मध्ये बहुजनांसह, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना आरक्षण दिले. असा समतेचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

या महाराष्ट्रात दलित, सुवर्ण वाद नसतो, ओबीसी मराठा वाद नसतो पण अलीकडे काही नेते हा वाद मुद्दाहून निर्माण करतात. आरक्षणावरून जातीय विषमता वाढवली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

मराठा समाजाला आधी शाहू महाराजांच्या काळात आरक्षण होते. १९६७ साली केंद्रीय ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात आले होते. मात्र १९६८ मध्ये ते रद्द करण्यात आले. आपला समाज हा सामाजिक मागास आहे. त्याचे सामाजिक मागासलेपण सिद्ध झाले आहे. उच्च न्यायालयाने ते वैध ठरवले आहे. असे असतानाही हा विषय सर्वोच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिली हे दुर्दैवी आहे. ५० टक्क्यांच्या वरती देशातील २३ राज्यात आरक्षणाची टक्केवारी वाढली आहे. मग तेथील आरक्षणाला स्थगिती का नाही? केवळ आणि केवळ महाराष्ट्रातच मराठा आरक्षणाला स्थगिती का? असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

पंचतारांकीत हॉटेलमध्ये बसून प्रश्न सुटणार नाही

८ मार्च पासून सुरू होत असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी कडे सर्वांनी लक्ष ठेवले पाहिजे. यात महाराष्ट्र सरकारची भूमिका फार महत्त्वाची आहे. राज्याने निष्काळजीपणा करून चालणार नाही. मुंबईत पंचतारांकित हॉटेल मध्ये बसून हा प्रश्न सुटणार नाहीत. सुप्रीम कोर्टात भक्कम पणे आरक्षणाची बाजू मांडली नाही. तर यास महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार आहे. चांगले वकील नियुक्त केले. त्याबद्दल सरकारचे स्वागत आहे. परंतु वकिलावर विसंबून न राहता समाजाला विश्वासात घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.