शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

एका भरणी वाचून रब्बी हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

टेंभुर्णी : टेंभुर्णीसह कालवा परिसरातील शेतक-यांनी धरणातून तीन वेळा पाणी सुटेल या आशेवर उशिरापर्यंत रब्बीची पेरणी केली. मात्र दोन ...

टेंभुर्णी : टेंभुर्णीसह कालवा परिसरातील शेतक-यांनी धरणातून तीन वेळा पाणी सुटेल या आशेवर उशिरापर्यंत रब्बीची पेरणी केली. मात्र दोन पाणी सोडल्यानंतर तिस-यांदा पाणी सोडण्यात पाटबंधारे प्रशासन असमर्थता दाखवित असल्याने कालवा परिसरातील शेतक-यांचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दरम्यान, जीवरेखा धरणातून आणखी एक पाणी सोडावे, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.

अकोलादेव येथील जीवरेखा धरणातून काढलेल्या १७. ६ कि. मी. लांबीच्या कालव्याचा टेंभुर्णी, अकोलादेव, गोंधनखेडा, सावंगी, पापळ परिसरातील १,२९९ हेक्टर क्षेत्राला रब्बी हंगामासाठी लाभ होतो. यावर्षी शेतक-यांनी उशिरापर्यंत गहू, हरभरा, शाळू ज्वारीची पेरणी केली. परिसरात आणखी या पिकांना पाण्याची गरज असताना जीवरेखा धरण प्रशासनाने पाण्याच्या दोन अवर्तनानंतर धरणातून सोडले जाणारे पाणी थांबविले आहे. एरवी धरण तुडुंब भरले असताना धरणातून रब्बी हंगामासाठी तीनवेळा पाणी सोडले जाते. मात्र यावर्षी पहिले पाणी उशिरा सुटल्याने धरणातून केवळ दोनदाच पाणी सोडण्यात आले आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना धरणातून सुटणारे पाणी रोखल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

पाटबंधारे विभागाने कमीत कमी आठ दिवसांसाठी तरी एक पाणी सोडावे, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे. एका भरणी वाचून कालवा परिसरातील शेतक-यांचा रबी हंगामच धोक्यात आल्याची प्रतिक्रिया शेतकरी कमळाजी जमधडे यांनी बोलून दाखविली. सध्या परिसरातील सर्व शेतक-यांच्या नजरा धरणातून सुटणा-या पाण्याकडे लागल्या आहेत.

चौकट

रब्बी हंगामासाठीच्या पाण्याची मुदत नियमाप्रमाणे २८ फेब्रुवारीला संपलेली आहे. मात्र टेंभुर्णी, अकोलादेव परिसरातून शेतकरी आणखी एका पाण्यासाठी मागणी करीत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ कार्यालयांंकडून जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीनंतरच पाणी सोडण्याबाबत काय तो निर्णय घेतला जाईल.

माधुरी जुन्नारे, शाखा अभियंता, टेंभुर्णी.