शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एका भरणी वाचून रब्बी हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

टेंभुर्णी : टेंभुर्णीसह कालवा परिसरातील शेतक-यांनी धरणातून तीन वेळा पाणी सुटेल या आशेवर उशिरापर्यंत रब्बीची पेरणी केली. मात्र दोन ...

टेंभुर्णी : टेंभुर्णीसह कालवा परिसरातील शेतक-यांनी धरणातून तीन वेळा पाणी सुटेल या आशेवर उशिरापर्यंत रब्बीची पेरणी केली. मात्र दोन पाणी सोडल्यानंतर तिस-यांदा पाणी सोडण्यात पाटबंधारे प्रशासन असमर्थता दाखवित असल्याने कालवा परिसरातील शेतक-यांचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दरम्यान, जीवरेखा धरणातून आणखी एक पाणी सोडावे, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.

अकोलादेव येथील जीवरेखा धरणातून काढलेल्या १७. ६ कि. मी. लांबीच्या कालव्याचा टेंभुर्णी, अकोलादेव, गोंधनखेडा, सावंगी, पापळ परिसरातील १,२९९ हेक्टर क्षेत्राला रब्बी हंगामासाठी लाभ होतो. यावर्षी शेतक-यांनी उशिरापर्यंत गहू, हरभरा, शाळू ज्वारीची पेरणी केली. परिसरात आणखी या पिकांना पाण्याची गरज असताना जीवरेखा धरण प्रशासनाने पाण्याच्या दोन अवर्तनानंतर धरणातून सोडले जाणारे पाणी थांबविले आहे. एरवी धरण तुडुंब भरले असताना धरणातून रब्बी हंगामासाठी तीनवेळा पाणी सोडले जाते. मात्र यावर्षी पहिले पाणी उशिरा सुटल्याने धरणातून केवळ दोनदाच पाणी सोडण्यात आले आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना धरणातून सुटणारे पाणी रोखल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

पाटबंधारे विभागाने कमीत कमी आठ दिवसांसाठी तरी एक पाणी सोडावे, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे. एका भरणी वाचून कालवा परिसरातील शेतक-यांचा रबी हंगामच धोक्यात आल्याची प्रतिक्रिया शेतकरी कमळाजी जमधडे यांनी बोलून दाखविली. सध्या परिसरातील सर्व शेतक-यांच्या नजरा धरणातून सुटणा-या पाण्याकडे लागल्या आहेत.

चौकट

रब्बी हंगामासाठीच्या पाण्याची मुदत नियमाप्रमाणे २८ फेब्रुवारीला संपलेली आहे. मात्र टेंभुर्णी, अकोलादेव परिसरातून शेतकरी आणखी एका पाण्यासाठी मागणी करीत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ कार्यालयांंकडून जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीनंतरच पाणी सोडण्याबाबत काय तो निर्णय घेतला जाईल.

माधुरी जुन्नारे, शाखा अभियंता, टेंभुर्णी.