शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

एका भरणी वाचून रब्बी हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

टेंभुर्णी : टेंभुर्णीसह कालवा परिसरातील शेतक-यांनी धरणातून तीन वेळा पाणी सुटेल या आशेवर उशिरापर्यंत रब्बीची पेरणी केली. मात्र दोन ...

टेंभुर्णी : टेंभुर्णीसह कालवा परिसरातील शेतक-यांनी धरणातून तीन वेळा पाणी सुटेल या आशेवर उशिरापर्यंत रब्बीची पेरणी केली. मात्र दोन पाणी सोडल्यानंतर तिस-यांदा पाणी सोडण्यात पाटबंधारे प्रशासन असमर्थता दाखवित असल्याने कालवा परिसरातील शेतक-यांचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दरम्यान, जीवरेखा धरणातून आणखी एक पाणी सोडावे, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.

अकोलादेव येथील जीवरेखा धरणातून काढलेल्या १७. ६ कि. मी. लांबीच्या कालव्याचा टेंभुर्णी, अकोलादेव, गोंधनखेडा, सावंगी, पापळ परिसरातील १,२९९ हेक्टर क्षेत्राला रब्बी हंगामासाठी लाभ होतो. यावर्षी शेतक-यांनी उशिरापर्यंत गहू, हरभरा, शाळू ज्वारीची पेरणी केली. परिसरात आणखी या पिकांना पाण्याची गरज असताना जीवरेखा धरण प्रशासनाने पाण्याच्या दोन अवर्तनानंतर धरणातून सोडले जाणारे पाणी थांबविले आहे. एरवी धरण तुडुंब भरले असताना धरणातून रब्बी हंगामासाठी तीनवेळा पाणी सोडले जाते. मात्र यावर्षी पहिले पाणी उशिरा सुटल्याने धरणातून केवळ दोनदाच पाणी सोडण्यात आले आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना धरणातून सुटणारे पाणी रोखल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

पाटबंधारे विभागाने कमीत कमी आठ दिवसांसाठी तरी एक पाणी सोडावे, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे. एका भरणी वाचून कालवा परिसरातील शेतक-यांचा रबी हंगामच धोक्यात आल्याची प्रतिक्रिया शेतकरी कमळाजी जमधडे यांनी बोलून दाखविली. सध्या परिसरातील सर्व शेतक-यांच्या नजरा धरणातून सुटणा-या पाण्याकडे लागल्या आहेत.

चौकट

रब्बी हंगामासाठीच्या पाण्याची मुदत नियमाप्रमाणे २८ फेब्रुवारीला संपलेली आहे. मात्र टेंभुर्णी, अकोलादेव परिसरातून शेतकरी आणखी एका पाण्यासाठी मागणी करीत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ कार्यालयांंकडून जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीनंतरच पाणी सोडण्याबाबत काय तो निर्णय घेतला जाईल.

माधुरी जुन्नारे, शाखा अभियंता, टेंभुर्णी.