शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:28 IST

टेंभुर्णी : मागील पंधरवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे टेंभुर्णीसह परिसरातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या वातावरणामुळे गहू, ...

टेंभुर्णी : मागील पंधरवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे टेंभुर्णीसह परिसरातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या वातावरणामुळे गहू, हरभरा, शाळू ज्वारी आदी पिकांवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

टेंभुर्णी परिसरात मागील १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय अनेकदा सकाळच्या वेळी दाट धुके पडत आहे. पिकांच्या वाढीसाठी पोषक नसलेल्या या वातावरणाचा रब्बी पिकांवर मोठा परिणाम होत आहे. शाळू ज्वारीवर मावा व चिकट्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तर गव्हाच्या पिकावर तांबोरा पडत आहे. याशिवाय हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सततच्या थंड - दमट वातावरणामुळे रब्बी उत्पादनात मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. यातच भर म्हणून टेंभुर्णीसह परिसरात चार दिवसांपूर्वी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतांमध्ये शाळू ज्वारीचे पीक आडवे झाले आहे.

विशेष म्हणजे ढगाळ वातावरणाचा आंब्याच्या मोहोरावरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे टेंभुर्णीसह परिसरातील गणेशपूर, सातेफळ, नळविहरा आदी ठिकाणचे केशर आंबा उत्पादक शेतकरीही अडचणीत आले आहेत.

फोटो ओळ : जोरदार वाऱ्यामुळे टेंभुर्णी येथील शेतकरी संतोष शिंदे यांच्या शेतातील शाळू ज्वारी आडवी झाली आहे.