शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:28 IST

टेंभुर्णी : मागील पंधरवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे टेंभुर्णीसह परिसरातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या वातावरणामुळे गहू, ...

टेंभुर्णी : मागील पंधरवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे टेंभुर्णीसह परिसरातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या वातावरणामुळे गहू, हरभरा, शाळू ज्वारी आदी पिकांवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

टेंभुर्णी परिसरात मागील १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय अनेकदा सकाळच्या वेळी दाट धुके पडत आहे. पिकांच्या वाढीसाठी पोषक नसलेल्या या वातावरणाचा रब्बी पिकांवर मोठा परिणाम होत आहे. शाळू ज्वारीवर मावा व चिकट्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तर गव्हाच्या पिकावर तांबोरा पडत आहे. याशिवाय हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सततच्या थंड - दमट वातावरणामुळे रब्बी उत्पादनात मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. यातच भर म्हणून टेंभुर्णीसह परिसरात चार दिवसांपूर्वी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतांमध्ये शाळू ज्वारीचे पीक आडवे झाले आहे.

विशेष म्हणजे ढगाळ वातावरणाचा आंब्याच्या मोहोरावरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे टेंभुर्णीसह परिसरातील गणेशपूर, सातेफळ, नळविहरा आदी ठिकाणचे केशर आंबा उत्पादक शेतकरीही अडचणीत आले आहेत.

फोटो ओळ : जोरदार वाऱ्यामुळे टेंभुर्णी येथील शेतकरी संतोष शिंदे यांच्या शेतातील शाळू ज्वारी आडवी झाली आहे.