शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:28 IST

टेंभुर्णी : मागील पंधरवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे टेंभुर्णीसह परिसरातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या वातावरणामुळे गहू, ...

टेंभुर्णी : मागील पंधरवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे टेंभुर्णीसह परिसरातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या वातावरणामुळे गहू, हरभरा, शाळू ज्वारी आदी पिकांवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

टेंभुर्णी परिसरात मागील १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय अनेकदा सकाळच्या वेळी दाट धुके पडत आहे. पिकांच्या वाढीसाठी पोषक नसलेल्या या वातावरणाचा रब्बी पिकांवर मोठा परिणाम होत आहे. शाळू ज्वारीवर मावा व चिकट्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तर गव्हाच्या पिकावर तांबोरा पडत आहे. याशिवाय हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सततच्या थंड - दमट वातावरणामुळे रब्बी उत्पादनात मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. यातच भर म्हणून टेंभुर्णीसह परिसरात चार दिवसांपूर्वी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतांमध्ये शाळू ज्वारीचे पीक आडवे झाले आहे.

विशेष म्हणजे ढगाळ वातावरणाचा आंब्याच्या मोहोरावरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे टेंभुर्णीसह परिसरातील गणेशपूर, सातेफळ, नळविहरा आदी ठिकाणचे केशर आंबा उत्पादक शेतकरीही अडचणीत आले आहेत.

फोटो ओळ : जोरदार वाऱ्यामुळे टेंभुर्णी येथील शेतकरी संतोष शिंदे यांच्या शेतातील शाळू ज्वारी आडवी झाली आहे.