शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

बदलत्या वातावरणामुळे रब्बीची पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा केवळ रब्बी हंगामावर आहेत. गत पंधरा दिवसांपासून या ...

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा केवळ रब्बी हंगामावर आहेत. गत पंधरा दिवसांपासून या भागात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. या वातावरणामुळे गहू, हरभऱ्यासह इतर पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे खराब हवामानामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले असून, गारपिटीचा धोकाही व्यक्त केला जात आहे. रब्बी हंगामातील पिके हाती येण्यास मोठा कालावधी आहे. त्यातच ही रोगराई पसरल्याने शेतकरी महागडी औषधे पिकांवर फवारणी करीत आहेत. रोगराईमुळे उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

मार्गदर्शनाची गरज

बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकरी विविध कंपन्यांची औषधे फवारणी करीत आहेत. शेतकऱ्यांसमोर असलेले संकट पाहता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

अमरजित देशमुख, आन्वा