शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

मूल्यमापनाच्या संथगतीमुळे दहावीच्या निकालावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

जालना : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले तरी अंतर्गत मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात येणार ...

जालना : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले तरी अंतर्गत मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात येणार आहे.

जालना जिल्ह्यात जवळपास ३२ हजारांपेक्षा अधिक मुले-मुली दहावीच्या परीक्षेसाठी पात्र ठरले असते. परंतु, यावेळी शासनाने कोरोना संसर्गामुळे परीक्षा न घेण्याचा निर्णय महिनाभरापूर्वीच जाहीर केला. परीक्षेमुळे गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन परीक्षा रद्द केल्याने सर्वत्र स्वागत होत आहे. असे असले तरी यातून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करताना शाळा पातळीवर अनेक अडचणी येत आहेत.

जालना जिल्ह्यात बहुतांश शाळांमध्ये दहावीचा निकाल ठरविण्यासाठी मूल्यमापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

असे असताना या मूल्यमापन समितीत तोंडी आणि लेखी परीक्षा घेताना अडचणी आल्या आहेत. काही ठिकाणी या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या.

एकीकडे प्रात्यक्षिक परीक्षांची अडचण यंदाही कायम आहे. कला, क्रीडा क्षेत्राचे गुणदान करतानाही शिक्षकांसमोर अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.

सरकारचा निर्णय महत्त्वाचा

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने दहावीसोबतच बारावी परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्यासाठी मूल्यमापन करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार शिक्षकांना सूचना दिल्या आहेत.

- कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी

मूल्यमापनानुसारच गुणदान

मूल्यमापन समिती प्रत्येक शाळेमध्ये स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून इयत्ता नववी आणि दहावी अशा दोन्ही वर्गातील त्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचे अवलोकन केले जात आहे. यातून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार आहे.

- ज्ञानेश्वर टेकाळे, शिक्षक

मूल्यमापनाचे नियम सरकारने निश्चित केले आहे. असे असले तरी एकूणच वेगवेगळे विषय आणि विशेष करून गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांना किती गुण द्यावे याचे सूत्र ठरले आहे. यातून विद्यार्थ्यांचे हित जपण्यावर भर दिला जात आहे.

- सचिन भारुटे, शिक्षक