शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

मूल्यमापनाच्या संथगतीमुळे दहावीच्या निकालावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

जालना : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले तरी अंतर्गत मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात येणार ...

जालना : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले तरी अंतर्गत मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात येणार आहे.

जालना जिल्ह्यात जवळपास ३२ हजारांपेक्षा अधिक मुले-मुली दहावीच्या परीक्षेसाठी पात्र ठरले असते. परंतु, यावेळी शासनाने कोरोना संसर्गामुळे परीक्षा न घेण्याचा निर्णय महिनाभरापूर्वीच जाहीर केला. परीक्षेमुळे गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन परीक्षा रद्द केल्याने सर्वत्र स्वागत होत आहे. असे असले तरी यातून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करताना शाळा पातळीवर अनेक अडचणी येत आहेत.

जालना जिल्ह्यात बहुतांश शाळांमध्ये दहावीचा निकाल ठरविण्यासाठी मूल्यमापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

असे असताना या मूल्यमापन समितीत तोंडी आणि लेखी परीक्षा घेताना अडचणी आल्या आहेत. काही ठिकाणी या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या.

एकीकडे प्रात्यक्षिक परीक्षांची अडचण यंदाही कायम आहे. कला, क्रीडा क्षेत्राचे गुणदान करतानाही शिक्षकांसमोर अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.

सरकारचा निर्णय महत्त्वाचा

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने दहावीसोबतच बारावी परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्यासाठी मूल्यमापन करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार शिक्षकांना सूचना दिल्या आहेत.

- कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी

मूल्यमापनानुसारच गुणदान

मूल्यमापन समिती प्रत्येक शाळेमध्ये स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून इयत्ता नववी आणि दहावी अशा दोन्ही वर्गातील त्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचे अवलोकन केले जात आहे. यातून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार आहे.

- ज्ञानेश्वर टेकाळे, शिक्षक

मूल्यमापनाचे नियम सरकारने निश्चित केले आहे. असे असले तरी एकूणच वेगवेगळे विषय आणि विशेष करून गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांना किती गुण द्यावे याचे सूत्र ठरले आहे. यातून विद्यार्थ्यांचे हित जपण्यावर भर दिला जात आहे.

- सचिन भारुटे, शिक्षक