शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

मूल्यमापनाच्या संथगतीमुळे दहावीच्या निकालावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

जालना : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले तरी अंतर्गत मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात येणार ...

जालना : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले तरी अंतर्गत मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात येणार आहे.

जालना जिल्ह्यात जवळपास ३२ हजारांपेक्षा अधिक मुले-मुली दहावीच्या परीक्षेसाठी पात्र ठरले असते. परंतु, यावेळी शासनाने कोरोना संसर्गामुळे परीक्षा न घेण्याचा निर्णय महिनाभरापूर्वीच जाहीर केला. परीक्षेमुळे गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन परीक्षा रद्द केल्याने सर्वत्र स्वागत होत आहे. असे असले तरी यातून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करताना शाळा पातळीवर अनेक अडचणी येत आहेत.

जालना जिल्ह्यात बहुतांश शाळांमध्ये दहावीचा निकाल ठरविण्यासाठी मूल्यमापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

असे असताना या मूल्यमापन समितीत तोंडी आणि लेखी परीक्षा घेताना अडचणी आल्या आहेत. काही ठिकाणी या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या.

एकीकडे प्रात्यक्षिक परीक्षांची अडचण यंदाही कायम आहे. कला, क्रीडा क्षेत्राचे गुणदान करतानाही शिक्षकांसमोर अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.

सरकारचा निर्णय महत्त्वाचा

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने दहावीसोबतच बारावी परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्यासाठी मूल्यमापन करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार शिक्षकांना सूचना दिल्या आहेत.

- कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी

मूल्यमापनानुसारच गुणदान

मूल्यमापन समिती प्रत्येक शाळेमध्ये स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून इयत्ता नववी आणि दहावी अशा दोन्ही वर्गातील त्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचे अवलोकन केले जात आहे. यातून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार आहे.

- ज्ञानेश्वर टेकाळे, शिक्षक

मूल्यमापनाचे नियम सरकारने निश्चित केले आहे. असे असले तरी एकूणच वेगवेगळे विषय आणि विशेष करून गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांना किती गुण द्यावे याचे सूत्र ठरले आहे. यातून विद्यार्थ्यांचे हित जपण्यावर भर दिला जात आहे.

- सचिन भारुटे, शिक्षक