शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

नागपूरच्या अधिवेशनात गाजणार जालना जिल्ह्यातील प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:30 IST

सोमवारपासून सुरू होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जालना जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर हे तिन्ही आमदार आवाज उठविणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभा निवडणुका गळ्यात गळे घालून लढलेल्या भाजप- शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून मतभेद झाले. या मतभेदाचे रूपांतर सर्वात जास्त आमदार असताना भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. या पक्षाचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जालना जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर हे तिन्ही आमदार आवाज उठविणार असल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती या निवडणुकीमुळे कमालीची ढवळून निघाली. लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपाने एकत्रित निवडणुका लढवून मते मागितली आणि जिल्ह्यातील मतदारांनी भाजपाला भरभरून मतदानही केले. यामध्ये शिवसेनेचा मात्र दारूण पराभव झाला. हा पराभव झाला असला तरी याच पक्षाचे सर्वेसर्वा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार नसला तरी शिवसेनेचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांचे मातोश्रीवरील राजकीय वजन आजही कायम आहे. तर घनसावंगी मतदार संघातून केवळ तीन हजार मतांनी पराभूत झालेले डॉ. हिकमत उढाण हे मातोश्रीच्या गुडबुक मधील नेते म्हणून सर्वत्र परिचित आहेत.जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार कैलास गोरंट्याल हे असून, ते स्वत:च्या हिंमतीवर निवडून आले आहेत. तर घनसावंगी मतदार संघातून राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी आपला गड कायम ठेवला आहे. त्यामुळे नागपूर अधिवेशनात राजेश टोपे आणि कैलास गोरंट्याल हे सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने विरोधकांची भूमिका ही खºया अर्थाने आता माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना निभवावी लागणार आहे. त्यातच शिवसेनेचे स्थानिक स्वराज्य मतदार संघातील आमदार अंबादास दानवे यांनी प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका घेतल्याचे स्वागतही करण्यात आले.एकूण राजकीय परिस्थिती पाहता जालना जिल्ह्यातील रस्ते, आरोग्य, पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना हे मुद्दे उपस्थित करणार असल्याचे भाजपच्या या तिन्ही आमदारांनी सांगितले. विशेष करून आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठवाडा विभागासाठी जी वॉटर ग्रीड योजना मोठ्या कष्टाने मंजूर करून घेतली होती, त्या योजनेला नवीन सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आमदार लोणीकर हे पाण्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उचलून धरणार असल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही महाविकास आघाडी यापूर्वीच कार्यरत होती. २१ डिसेंबर रोजी विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपणार आहे. त्या दृष्टीने पाचही आमदार हे नागपूर येथे एकत्र येणार असल्याने तेथेच यावर चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात येते.जालना जिल्हा परिषदेत आज घडीला असलेले अध्यक्ष अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष सतीश टोपे हे आता पुन्हा आपल्याला उपाध्यक्षपद मिळावे म्हणून तयारी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.नवीन वर्षात निवडीची शक्यताया अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कुठले पत्ते फेकतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे. २१ डिसेंबरला मुदत संपत असली तरी या निवडी लांबणीवर पडून त्या नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात होतील, अशीही चर्चा जि.प.वर्तुळात आहे.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनJalna z pजालना जिल्हा परिषदMLAआमदार