शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

नागपूरच्या अधिवेशनात गाजणार जालना जिल्ह्यातील प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:30 IST

सोमवारपासून सुरू होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जालना जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर हे तिन्ही आमदार आवाज उठविणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभा निवडणुका गळ्यात गळे घालून लढलेल्या भाजप- शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून मतभेद झाले. या मतभेदाचे रूपांतर सर्वात जास्त आमदार असताना भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. या पक्षाचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जालना जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर हे तिन्ही आमदार आवाज उठविणार असल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती या निवडणुकीमुळे कमालीची ढवळून निघाली. लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपाने एकत्रित निवडणुका लढवून मते मागितली आणि जिल्ह्यातील मतदारांनी भाजपाला भरभरून मतदानही केले. यामध्ये शिवसेनेचा मात्र दारूण पराभव झाला. हा पराभव झाला असला तरी याच पक्षाचे सर्वेसर्वा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार नसला तरी शिवसेनेचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांचे मातोश्रीवरील राजकीय वजन आजही कायम आहे. तर घनसावंगी मतदार संघातून केवळ तीन हजार मतांनी पराभूत झालेले डॉ. हिकमत उढाण हे मातोश्रीच्या गुडबुक मधील नेते म्हणून सर्वत्र परिचित आहेत.जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार कैलास गोरंट्याल हे असून, ते स्वत:च्या हिंमतीवर निवडून आले आहेत. तर घनसावंगी मतदार संघातून राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी आपला गड कायम ठेवला आहे. त्यामुळे नागपूर अधिवेशनात राजेश टोपे आणि कैलास गोरंट्याल हे सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने विरोधकांची भूमिका ही खºया अर्थाने आता माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना निभवावी लागणार आहे. त्यातच शिवसेनेचे स्थानिक स्वराज्य मतदार संघातील आमदार अंबादास दानवे यांनी प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका घेतल्याचे स्वागतही करण्यात आले.एकूण राजकीय परिस्थिती पाहता जालना जिल्ह्यातील रस्ते, आरोग्य, पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना हे मुद्दे उपस्थित करणार असल्याचे भाजपच्या या तिन्ही आमदारांनी सांगितले. विशेष करून आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठवाडा विभागासाठी जी वॉटर ग्रीड योजना मोठ्या कष्टाने मंजूर करून घेतली होती, त्या योजनेला नवीन सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आमदार लोणीकर हे पाण्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उचलून धरणार असल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही महाविकास आघाडी यापूर्वीच कार्यरत होती. २१ डिसेंबर रोजी विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपणार आहे. त्या दृष्टीने पाचही आमदार हे नागपूर येथे एकत्र येणार असल्याने तेथेच यावर चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात येते.जालना जिल्हा परिषदेत आज घडीला असलेले अध्यक्ष अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष सतीश टोपे हे आता पुन्हा आपल्याला उपाध्यक्षपद मिळावे म्हणून तयारी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.नवीन वर्षात निवडीची शक्यताया अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कुठले पत्ते फेकतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे. २१ डिसेंबरला मुदत संपत असली तरी या निवडी लांबणीवर पडून त्या नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात होतील, अशीही चर्चा जि.प.वर्तुळात आहे.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनJalna z pजालना जिल्हा परिषदMLAआमदार