शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नागपूरच्या अधिवेशनात गाजणार जालना जिल्ह्यातील प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:30 IST

सोमवारपासून सुरू होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जालना जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर हे तिन्ही आमदार आवाज उठविणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभा निवडणुका गळ्यात गळे घालून लढलेल्या भाजप- शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून मतभेद झाले. या मतभेदाचे रूपांतर सर्वात जास्त आमदार असताना भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. या पक्षाचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जालना जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर हे तिन्ही आमदार आवाज उठविणार असल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती या निवडणुकीमुळे कमालीची ढवळून निघाली. लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपाने एकत्रित निवडणुका लढवून मते मागितली आणि जिल्ह्यातील मतदारांनी भाजपाला भरभरून मतदानही केले. यामध्ये शिवसेनेचा मात्र दारूण पराभव झाला. हा पराभव झाला असला तरी याच पक्षाचे सर्वेसर्वा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार नसला तरी शिवसेनेचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांचे मातोश्रीवरील राजकीय वजन आजही कायम आहे. तर घनसावंगी मतदार संघातून केवळ तीन हजार मतांनी पराभूत झालेले डॉ. हिकमत उढाण हे मातोश्रीच्या गुडबुक मधील नेते म्हणून सर्वत्र परिचित आहेत.जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार कैलास गोरंट्याल हे असून, ते स्वत:च्या हिंमतीवर निवडून आले आहेत. तर घनसावंगी मतदार संघातून राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी आपला गड कायम ठेवला आहे. त्यामुळे नागपूर अधिवेशनात राजेश टोपे आणि कैलास गोरंट्याल हे सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने विरोधकांची भूमिका ही खºया अर्थाने आता माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना निभवावी लागणार आहे. त्यातच शिवसेनेचे स्थानिक स्वराज्य मतदार संघातील आमदार अंबादास दानवे यांनी प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका घेतल्याचे स्वागतही करण्यात आले.एकूण राजकीय परिस्थिती पाहता जालना जिल्ह्यातील रस्ते, आरोग्य, पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना हे मुद्दे उपस्थित करणार असल्याचे भाजपच्या या तिन्ही आमदारांनी सांगितले. विशेष करून आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठवाडा विभागासाठी जी वॉटर ग्रीड योजना मोठ्या कष्टाने मंजूर करून घेतली होती, त्या योजनेला नवीन सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आमदार लोणीकर हे पाण्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उचलून धरणार असल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही महाविकास आघाडी यापूर्वीच कार्यरत होती. २१ डिसेंबर रोजी विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपणार आहे. त्या दृष्टीने पाचही आमदार हे नागपूर येथे एकत्र येणार असल्याने तेथेच यावर चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात येते.जालना जिल्हा परिषदेत आज घडीला असलेले अध्यक्ष अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष सतीश टोपे हे आता पुन्हा आपल्याला उपाध्यक्षपद मिळावे म्हणून तयारी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.नवीन वर्षात निवडीची शक्यताया अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कुठले पत्ते फेकतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे. २१ डिसेंबरला मुदत संपत असली तरी या निवडी लांबणीवर पडून त्या नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात होतील, अशीही चर्चा जि.प.वर्तुळात आहे.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनJalna z pजालना जिल्हा परिषदMLAआमदार