शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्या अवाक्याबाहेर; आता मसूर डाळीवरच मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात तेजी लोकमत न्यूज नेटवर्क जालना : एकीकडे इंधन दरवाढीने सर्वच किराणा मालाचे भाव वाढले आहेत. त्यात ...

पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात तेजी

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : एकीकडे इंधन दरवाढीने सर्वच किराणा मालाचे भाव वाढले आहेत. त्यात विशेष करून डाळींच्या भावात तेजी-मंदी सुरू आहे.

दररोजच्या जेवणामध्ये डाळींचे आणि भाज्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळे जीवनसत्त्व या दोन्ही वस्तूंमधून मिळतात. त्यामुळे या दोन्ही बाबी नित्याची गरज बनली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने भाज्यांची आवक घटली आहे. याचा परिणाम काही अंशी भाज्यांच्या भाववाढीवर झाला आहे. डाळींचे दर कमी होण्याचे नाव घेत नसून, केवळ मसुराची डाळ हीच सध्या शंभरीच्या आत असल्याचे दिसून येत आहे.

म्हणून डाळ महागली...

n मध्यंतरी घटलेले उत्पादन आणि वाहतुकीचा खर्च यातून डाळींचे भाव वाढले आहेत. हे कमी होण्याचे नाव घेत नसून, शंभर रुपयांपेक्षा अधिकच जास्तीचे पैसे हे एका किलोसाठी मोजावे लागत आहेत.

n केंद्र सरकारने नवीन धोरणानुसार डाळींचा साठा मर्यादित केला आहे. याचाही परिणाम भावात कमी-अधिक होण्यामध्ये झाला आहे.

म्हणून भाजीपाला कडाडला

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सततचा पाऊस यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाजींच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. ही दरवाढ लगेचच खाली येईल, अशी शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

सर्वसामान्यांचे हाल

डाळी आणि भाज्यांमध्ये अचानक झालेली दरवाढ ही परवडणारी नाही. कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, त्यात ही दरवाढ डोकेदुखी ठरत आहे. - माया लोंढे

भाववाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. विशेष करून भाज्या आणि डाळी या जेवणातील अविभाज्य घटक आहेत. सरकारने हे दर स्थिर ठेवावेत. - मंदा गायकवाड