शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्या अवाक्याबाहेर; आता मसूर डाळीवरच मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात तेजी लोकमत न्यूज नेटवर्क जालना : एकीकडे इंधन दरवाढीने सर्वच किराणा मालाचे भाव वाढले आहेत. त्यात ...

पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात तेजी

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : एकीकडे इंधन दरवाढीने सर्वच किराणा मालाचे भाव वाढले आहेत. त्यात विशेष करून डाळींच्या भावात तेजी-मंदी सुरू आहे.

दररोजच्या जेवणामध्ये डाळींचे आणि भाज्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळे जीवनसत्त्व या दोन्ही वस्तूंमधून मिळतात. त्यामुळे या दोन्ही बाबी नित्याची गरज बनली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने भाज्यांची आवक घटली आहे. याचा परिणाम काही अंशी भाज्यांच्या भाववाढीवर झाला आहे. डाळींचे दर कमी होण्याचे नाव घेत नसून, केवळ मसुराची डाळ हीच सध्या शंभरीच्या आत असल्याचे दिसून येत आहे.

म्हणून डाळ महागली...

n मध्यंतरी घटलेले उत्पादन आणि वाहतुकीचा खर्च यातून डाळींचे भाव वाढले आहेत. हे कमी होण्याचे नाव घेत नसून, शंभर रुपयांपेक्षा अधिकच जास्तीचे पैसे हे एका किलोसाठी मोजावे लागत आहेत.

n केंद्र सरकारने नवीन धोरणानुसार डाळींचा साठा मर्यादित केला आहे. याचाही परिणाम भावात कमी-अधिक होण्यामध्ये झाला आहे.

म्हणून भाजीपाला कडाडला

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सततचा पाऊस यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाजींच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. ही दरवाढ लगेचच खाली येईल, अशी शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

सर्वसामान्यांचे हाल

डाळी आणि भाज्यांमध्ये अचानक झालेली दरवाढ ही परवडणारी नाही. कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, त्यात ही दरवाढ डोकेदुखी ठरत आहे. - माया लोंढे

भाववाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. विशेष करून भाज्या आणि डाळी या जेवणातील अविभाज्य घटक आहेत. सरकारने हे दर स्थिर ठेवावेत. - मंदा गायकवाड