शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

पिकांच्या वर्गवारीनुसारच भरपाई द्या, जालना जिल्ह्यातील शेतक-यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:24 IST

फळबाग, बियाणे उत्पादक, भाजीपाला आदी पिकांच्या वर्गवारीनुसारच गारपिटीने नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळावी, अशी आपली मागणी आहे. हा मुद्दा आपण आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

ठळक मुद्देदिवाकर रावते : गारपिटीने नुकसान झालेल्या द्राक्ष, भाजीपाला व पिकांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : फळबाग, बियाणे उत्पादक, भाजीपाला आदी पिकांच्या वर्गवारीनुसारच गारपिटीने नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळावी, अशी आपली मागणी आहे. हा मुद्दा आपण आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी येथे सांगितले.जालना शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी पाच दिवसांपूर्वी गारपीट आणि अवकाळ पाऊस झाला होता. यात तब्बल ३८ हजार हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. रावते यांनी शुक्रवारी दुपारी जालना तालुक्यातील वाघु्रळ येथे द्राक्ष बागा, भाजीपाला व इतर गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. या पाहणीत शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी पिकांच्या वर्गवारीनुसार भरपाई मिळवून देण्याची मागणी रावते यांच्याकडे केली. त्यानंतर हा मुद्दा अत्यंत योग्य असून, एक एकर फळबागेतून मिळणारे उत्पन्न अधिक असते. त्यानंतर बियाणे उत्पादन, भाजीपाला आणि पारंपरिक पिकांचे उत्पादन मिळते. मात्र, या पिकांचे नुकसान झाल्यास सरसकट भरपाई जाहीर केली जाते. हे अयोग्य असून, पिकांच्या वर्गवारीनुसारच नुकसान भरपाई वा आर्थिक मदत जाहीर केली जावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. यावेळी नुकसान झालेल्या पिकांचे युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश रावते यांनी अधिकाºयांना दिले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, पंचायत समिती पांडुरंग डोंगरे, भाऊसाहेब घुगे, संतोष मोहिते, बबन खरात, बाला परदेशी, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार विपीन पाटील उपस्थित होते.