शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

कच-यातून खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:37 IST

ओल्या कच-यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ओल्या कच-यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेतला आहे. पालिका प्रशासन, सामाजिक संघटना आणि जनतेच्या सहकार्यातून शहरात प्रभागनिहाय खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, या कामात सर्वांंनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी गुरुवारी येथे केले.जालना नगर परिषदेतर्फे ओल्या कच-यापासून खत निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रायोगिक तत्त्वावर मोतीबाग उद्यानात आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी गोरंट्याल बोलत होत्या. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी उपनगराध्यक्ष शाह आलम खान, इसा खा पठाण, राधाकिसन दाभाडे, विष्णू वाघमारे, रोहित बनवस्कर, स्वच्छता विभाग प्रमुख माधव जमधडे, अनिरुध्द निरंतर, शशांक कुलकर्णी, संदीप पाटील, डॉ. संजय रु ईखेडकर, नटराज चौधरी आदी उपस्थित होते.नगराध्यक्षा म्हणाल्या की, जालना शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या कामाला गेल्या काही दिवसांत निश्चितपणे गती आली असून, या कामात सर्वांनीच पुढाकार घेतल्याचे समाधान होत आहे. ओला आणि सुका कचरा यापूर्वी रेवगाव रोडवरील कचरा डेपोमध्ये पाठवला जात होता.आता मात्र बॅक्टेरियल कल्चर जिवाणूच्या माध्यमातून ओल्या कच-यापासून खत निर्मिती करण्यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेतला आहे.एकीकडे खत निर्मितीच्या माध्यमातून पालिकेला मासिक उत्पन्न मिळण्याबरोबरच दुसरीकडे शहर स्वच्छतेसाठी मोठी मदत अशा प्रकल्पामुळे होणार आहे. एका प्रकल्पाची खतनिर्मितीची क्षमता ११०० किलो इतकी राहणार असून, तीस ते चाळीस दिवसांत खत तयार होणार आहे.तयार झालेल्या खताचे नमुने तपासणीसाठी कृषी खात्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगून संबंधित विभागाने प्रमाणित केल्यानंतर नगर परिषदेमार्फत तयार सेंद्रीय खत शेतक-यांना विक्री केले जाईल. प्रभागाबरोबरच जालना पालिकेच्या मागील बाजूस, जलशुध्दीकरण केंद्राच्या जागेत अशा प्रकारचे खत निर्मितीचे प्रकल्प सुरु करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.कोल्हापूर येथील अनिरुद्ध निरंतर यांनी उपस्थितांना ओल्या कचºयापासून खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवून यासंदर्भात मार्गदर्शन केले. आतापर्यंत राज्यातील जवळपास ३५ नगरपालिकांनी हा प्रकल्प सुुरु केलेला असून, त्यातून काही नगरपालिकांना उत्पन्नदेखील मिळू लागल्याचे त्यांनी सांगितले.