शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

शिबिरातून ‘समाधान’ होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:00 IST

समाधान शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समानतेने विकास करण्यावर भर देण्यात येत असून घनसावंगी तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी गत तीन वर्षात ६८५ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

घनसावंगी : समाधान शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समानतेने विकास करण्यावर भर देण्यात येत असून घनसावंगी तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी गत तीन वर्षात ६८५ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.जिल्ह्यात घेण्यात येणा-या समाधान शिबिराची पूर्वतयारी आढावा बैठक सोमवारी घनसावंगी येथे लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.या वेळी आ. राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, माजी आ. विलास खरात, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीष टोपे, अंकुश बोबडे, नगराध्यक्षा योजना देशमुख, संजय तौर, रघुनाथ तौर, सुनील आर्दड, सर्जेराव जाधव, देवनाथ जाधव, फय्याज खान पठाण, विश्वजित खरात, मुरलीधर चौधरी, विलास तांगडे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, तहसीलदार अश्विनी डमरे, तहसीलदार दत्तात्रय भारस्कर आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, शासनाच्या बहुतांश योजना आॅनलाईन पद्धतीने राबविण्यावर भर देण्यात येत असून, या योजनेचा लाभ समाजातील गरजूंना व्हावा यासाठी जालना व परभणी जिल्ह्यात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. जे अधिकारी, कर्मचारी त्यांचे काम चोखपणे करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शासनाच्या योजना गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी जोंधळे यांनी सांगितले. जि.प. माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांची भाषणे झाली. या वेळी पदाधिकारी, सर्व विभागांचे प्रमुख तसेच तालुकास्तरीय अधिका-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.--------रिक्त जागा तातडीने भरा - टोपेआ. टोपे म्हणाले की, प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेले समाधान शिबीर हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. परंतु शासकीय योजनांची अंमलबाजवणी करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचाºयांचा जागा रिक्त असून त्या तातडीने भरण्याची आवश्यकता आहे.