केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील ३३/११ उपकेंद्रावरून आठ गावातील १२० रोहित्रांचा वीज पुरवठा करण्यात आला आहे. थकीत वीज बिलामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून, याचा फटका १,०९० वीज ग्राहकांना बसत आहे.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली होती. तर यंदा रोगराईमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीवर मात करून शेतकऱ्यांनी रब्बीतील पिके जोपासली. सध्या गहू, ज्वारी, हरभरा, मका पिके हाती येण्याची वेळ असून, शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. थकीत बिलाचा मुद्दा पुढे करून कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणने अचानक कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. केदारखेडा, बामखेडा, मेरखेडा, जवखेडा ठोंबरे, देऊळगाव ताड, चिंचोली, टाकळी, बरंजळा लोंखडे आदी गावातील १२० रोहित्रावरील १,०९० वीज पंप बंद आहे.
केदारखेडा वीज केंद्रांतर्गत आठ गावातील १२० रोहित्रावरील १०९० वीज पंपाचे कनेक्शन कट. केदारखेडा- येथील ३३/११ के व्ही विज उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या आठ गावातील १२० रोहित्रांवरील १,०९० वीज पंपाचे कनेक्शन कट करण्यात आले आहे. शेतक-यांचे ऐन रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, मका पिके हातात येण्याची वेळ आसताना मुस्कटदाबी होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. थकीत बिलाचा मुद्दा पुढे करुन कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरणने वीज पंपाची कट केलेल्या विजेमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. केदारखेडा, बामखेडा, मेरखेडा, जवखेडा ठोंबरे, देऊळगाव ताड, चिंचोली, टाकळी, बरंजळा लोखंडे आदी गावातील १२० रोहित्रावरील १,०९० वीज पंप बंद पडले आहेत. त्यामुळे हाताशी आलेली रब्बीतील पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.