शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट सेवेमुळे टपाल कार्यालयास संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:55 IST

संवाद क्रांतीमुळे टपाल सेवा सुरू राहील की नाही, अशी स्थिती असताना टपाल कार्यालयात पासपोर्टसारखी महत्त्वाची सेवा सुरू झाल्याने या कार्यालयाचे महत्त्व आणखी वाढले आहे. लवकरच टपाल कार्यालयात बँकींग सेवाही सुरू होईल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सोमवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संवाद क्रांतीमुळे टपाल सेवा सुरू राहील की नाही, अशी स्थिती असताना टपाल कार्यालयात पासपोर्टसारखी महत्त्वाची सेवा सुरू झाल्याने या कार्यालयाचे महत्त्व आणखी वाढले आहे. लवकरच टपाल कार्यालयात बँकींग सेवाही सुरू होईल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी येथे सोमवारी केले.येथील मुख्य टपाल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या उघाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, पुणे पासपोर्ट कार्यालयाचे विभागीय अधिकारी अनंत ताकवाले, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, औरंगाबाद विभागाचे मुख्य पोस्टमास्टर प्रणवकुमार, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी आ. विलास खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.खा. दानवे म्हणाले, की सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून सरकार विविध सोयी-सुविधा निर्माण उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देत आहे. जालना येथील पासपोर्ट केंद्राप्रमाणे राज्यात इतर जिल्ह्यातही टप्प्याटप्प्याने पासपोर्ट केंद्र सुरू करण्यात येणार आहे. देशातील बंद असलेली विमानतळे सुरू करण्यावर केंद्र शासन भर देत आहे. याचा फायदा देशांतर्गत विमान वाहतुकीस होणार असल्याने देशातील उद्योजकांचे ९०० विमाने खरेदी करण्याचे नियोजन आहे. या पासपोर्ट सेवा केंद्राचा सर्वसामान्यांसह व्यापारी, उद्योजक व हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लीम बांधवांना फायदा होईल, असे खा. दानवे यांनी सांगितले.नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी पासपोर्ट सेवा सुरू केल्याबद्दल खा. दानवे यांचे आभार मानत, या कार्यालयास आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याची ग्वाही दिली. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले, की जालन्यात रसायन तंत्रज्ञान संस्था, समृद्धी महामार्ग, ड्रायपोर्ट आदींमुळे दळणवळण अधिक वेगवान होणार आहे. त्यामुळे येथील पासपोर्ट कार्यालयाचा प्रत्येकाला फायदा होईल. पासपोर्ट कार्यालयाच्या परिसरात उद्योजकांनी सीएसआर फंडातून सुशोभीकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्य पोस्टमास्टर प्रवणकुमार यांनी टपाल कार्यालयाच्या माध्यमातून सुरू केलेल्या या पासपोर्ट कार्यालयात आवश्यक सुविधा देण्याची ग्वाही दिली. औरंगाबादमध्ये सुरू केलेले पासपोर्ट कार्यालय सध्या देशातील सर्वाधिक अर्ज प्राप्त होणारे कार्यालय ठरले असून, येथे दिवसाकाठी २०० अर्ज प्राप्त होत असल्याचे ते म्हणाले. जालना येथील या सेवा केंद्रास असाच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.टपाल कार्यालयात सर्वसामान्य व दिव्यांगांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले.प्रारंभी खा. दानवे यांच्या हस्ते फित कापून पासपोर्ट केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विविध पक्ष, संघटना, व्यापारी व मुस्लीम बांधवांच्यावतीने खा. दानवे यांचा सत्कार करण्यात आला. शशिकांत नटके यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास माजी आ.अरविंद चव्हाण, भाजपा उपाध्यक्ष भास्कर दानवे, उद्योजक सुनील रायठठ्ठा, रितेश मिश्रा, घनश्याम गोयल, किशोर अग्रवाल, अर्जुुन गेही, विलास नाईक, देविदास देशमुख, राजेश जोशी यांच्यासह शहरातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.नगराध्यक्षा : आता पासपोर्टचे नूतनीकरण करून घेईन...!जालन्यात सुरू झालेल्या टपाल कार्यालयाचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी प्रयत्न केले जातील. परिसरात अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी दिली. पासपोर्ट सेवा केंद्राचा प्रत्येकालाच फायदा होणार आहे. ‘माझ्या पासपोर्टचे नूतनीकरण अनेक दिवसांपासून करायचे आहे. मात्र, कधी मला वेळ नसतो तर कधी गोरंट्याल साहेबांना वेळ नसतो. मात्र, आता जालन्यातच पासपोर्ट केंद्र झाल्याने आपण स्वत: येथे येऊन नूतनीकरण करून घेऊ’, असेही नगराध्यक्षा म्हणल्या. खा. दानवे यांनीही हाच धागा पकडत ग्रीन व रेड पासपोर्टबद्दल परदेशात आलेला अनुभव कथन केला.

टॅग्स :passportपासपोर्टRaosaheb Danweरावसाहेब दानवे