शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

गरिबांची ‘उज्ज्वला’ गॅसवरून पुन्हा चुलीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST

जालना : मागील काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने गरीब कुटुंब हैराण झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान ...

जालना : मागील काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने गरीब कुटुंब हैराण झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत मिळालेला मोफत गॅस बंद करून गृहिणी चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आले.

गोरगरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळावे, तसेच महिलांची धुरापासून सुटका व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले. त्यामुळे महिलांची धुरातून सुटका झाली होती, परंतु मागील काही दिवसांपासून गॅसचे दर वाढत आहे. आता गॅस जवळपास ८०० रुपयांपर्यंत पोहोचला

आहे. त्यामुळे बहुतांश महिला गॅसवर स्वयंपाक करण्याऐवजी चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहे. आमच्या प्रतिनिधींनी जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाहणी केली असता, दरवाढीमुळे बहुतांश महिला चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे दिसून आले आहे. दरवाढ कमी करण्याची मागणी होत आहे.

महागाईमुळे आर्थिक गणित बिघडले

मागील काही दिवसांपासून गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. गॅस ८०० रुपयांवर गेल्याने आर्थिक गणित बिघडले आहे.

आमचे चार जणांचे कुटुंब आहे. मोलमजुरी करून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आम्हाला उज्ज्वला योजनाचा गॅस मिळाला आहे. सुरुवातीला आम्ही त्याचा वापरही केला, परंतु गॅसचे दर वाढल्यामुळे गॅसला बाजूला ठेवले आहे आणि आता चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याचे एका महिलेने सांगितले.

गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरवाढीमुळे गृहिणीच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकार सबसिडीच्या नावाखाली पूर्ण पैसे वसूल करत आहे. सरकारने सबसिडी पूर्ववत करावी आणि गॅसच्या किमती नियंत्रित ठेवून गृहिणींना दिलासा द्यावा. आता आम्हाला चुलीशिवाय पर्याय नाही.

- निलोफर नजीब शेख

गृहिणी

महागाईमुळे त्रस्त असून, खर्चाचे नियोजन कोलमडले आहे. कधी-कधी अधिक प्रमाणात गॅसचा वापर होत असल्याने, महाग झालेले गॅस सिलिंडर आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किमती माफक असाव्यात, यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे. निर्मला गायकवाड

गृहिणी

मागील काही दिवसांपासून गॅसचे भाव दिवसागणिक वाढत आहे. वाढत्या दरवाढीमुळे स्वयंपाक घरातील नियोजन कोलमडले आहे. आता गॅस परवडत नसल्याने चूल पेटवावी लागत आहे. मोदींनी सुरू केलेली योजना आता फक्त नावालच उरली आहे. शासनाने गॅसचे दर कमी करून महिलांना धुराच्या त्रासातून मुक्त करावे.

- निर्मला पवळ, गृहिणी