शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

परतुरात पोलिसांची खिळखिळी घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:51 IST

पोलीस निवास्थानांमधील घरे पूर्णपणे खिळखिळी झाली आहेत. एकही घर राहण्योग्य नसताना पोलीस कुटुंबियांना नाईलाजास्तव येथे राहावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : येथील पोलीस निवास्थानांमधील घरे पूर्णपणे खिळखिळी झाली आहेत. एकही घर राहण्योग्य नसताना पोलीस कुटुंबियांना नाईलाजास्तव येथे राहावे लागत आहे.परतूर पोलीस वसाहतीमधील या घरांची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. स्वच्छता गृहाची दुरवस्था, फुटलेल्या नाल्या, सांडपाण्याची व्यवस्था नसणे, खिडक्यांची फुटलेली काच, मोडलेले दरवाजे, त्याला ठिकठिकाणी गेलेले तडे, पावसाळ्यात छताला लागणारी गळती आदी समस्यांना या ठिकाणी राहणारे पोलीस कुटुंब तोंड येत आहेत. या वसाहतीतील एकही घर राहण्यायोग्य राहिले नाही. या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहाची तोड-फोड झाली आहे. अनेक ठिकाणी दरवाजे गायब झाले आहेत. ही स्वच्छतागृह पूर्णत: निकामी झाली आहेत. निवासस्थानांचे दरवाजेही पूर्णत: तुटले आहेत. फरशा फुटल्या आहेत. भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत. पावसाळ्यात छतातून पाणी येत असल्याने पोलीस कुटुंबियांना रात्र जागून काढावी लागते.परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धुळीचा सामना येथील पोलीस कुटुंबियांना करावा लागत आहे. अनेकदा या निवासस्थानांची तात्पुरती व आवश्यक डागडुजी कर्मचारी स्वत: करत असतात. त्याचा खर्चही कर्मचा-यांना मिळत नाही. पूर्ण निवासस्थानेच जीर्ण झाली असल्याने दुरुस्तीचाही उपयोग होत नाही. या निवासस्थानांचा नवीन प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात अनेक वर्षापासून काहीच कार्यवाही झाली नाही. तरी या निवास्थानाच्या प्रश्नाकडे पोलिस प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.