शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

परतुरात पोलिसांची खिळखिळी घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:51 IST

पोलीस निवास्थानांमधील घरे पूर्णपणे खिळखिळी झाली आहेत. एकही घर राहण्योग्य नसताना पोलीस कुटुंबियांना नाईलाजास्तव येथे राहावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : येथील पोलीस निवास्थानांमधील घरे पूर्णपणे खिळखिळी झाली आहेत. एकही घर राहण्योग्य नसताना पोलीस कुटुंबियांना नाईलाजास्तव येथे राहावे लागत आहे.परतूर पोलीस वसाहतीमधील या घरांची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. स्वच्छता गृहाची दुरवस्था, फुटलेल्या नाल्या, सांडपाण्याची व्यवस्था नसणे, खिडक्यांची फुटलेली काच, मोडलेले दरवाजे, त्याला ठिकठिकाणी गेलेले तडे, पावसाळ्यात छताला लागणारी गळती आदी समस्यांना या ठिकाणी राहणारे पोलीस कुटुंब तोंड येत आहेत. या वसाहतीतील एकही घर राहण्यायोग्य राहिले नाही. या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहाची तोड-फोड झाली आहे. अनेक ठिकाणी दरवाजे गायब झाले आहेत. ही स्वच्छतागृह पूर्णत: निकामी झाली आहेत. निवासस्थानांचे दरवाजेही पूर्णत: तुटले आहेत. फरशा फुटल्या आहेत. भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत. पावसाळ्यात छतातून पाणी येत असल्याने पोलीस कुटुंबियांना रात्र जागून काढावी लागते.परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धुळीचा सामना येथील पोलीस कुटुंबियांना करावा लागत आहे. अनेकदा या निवासस्थानांची तात्पुरती व आवश्यक डागडुजी कर्मचारी स्वत: करत असतात. त्याचा खर्चही कर्मचा-यांना मिळत नाही. पूर्ण निवासस्थानेच जीर्ण झाली असल्याने दुरुस्तीचाही उपयोग होत नाही. या निवासस्थानांचा नवीन प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात अनेक वर्षापासून काहीच कार्यवाही झाली नाही. तरी या निवास्थानाच्या प्रश्नाकडे पोलिस प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.