शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

वडीगोद्री परिसरात भगरीतून ३० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 19:21 IST

उपवासाला फराळ म्हणून शाबूदान्यासह भगरीच्या दशम्या, भगरीचा भात खाल्ला जातो.

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील सहा नागरिकांना भगरीतून विषबाधा ( food poisoning) झाल्यानंतर आता वडीगोद्री, भांबेरी या गावातील ३० जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाल्याने लोक उपवास धरतात. उपवासाला फराळ म्हणून शाबूदान्यासह भगरीच्या दशम्या, भगरीचा भात खाल्ला जातो. दोन दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटी येथे भगरीतून सातजणांना विषबाधा झाली. त्यानंतर आता वडीगोद्री, भांबेरी या गावांतही भगर खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मळमळ, उलट्या, अंगाचा थरकाप होणे, आदी त्रास या रुग्णांना होत आहे. यात वडीगोद्री येथील ज्ञानेश्वर भवर (वय ३३), पुष्पाबाई भवर (६०), सुनीता काळे (४०), मंदा काळे (६५), शिवकन्या काळे (३५), लक्ष्मीबाई शेळके (६५), संकेत काळे (१२), सुमित्रा काळे, राजेंद्र राठोड (३२), जनाबाई गावडे (४०), बाबूराव लिपणे (३०), राणूजी कोरटकर (५८), कोमल खटके (२८), तर भांबेरी येथील सुरेश केजभट, संगीता कनके, नंदा कनके, मीराबाई खरात, रेखा कनके, उषाबाई कनके, गयाबाई कनके, सुबिदर कनके, सीताबाई करमाळे, कमलबाई साळुंके, राधाकिशन कनके, सीताराम कनके, सूर्यभान कनके, जनाबाई कनके, मंगलबाई कनके, आदींचा समावेश असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची तब्बेत चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी सुट्टी भगर खाणे टाळावे, असे आवाहन अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पराग नरवाडे यांनी केले.

टॅग्स :Jalanaजालनाfood poisoningअन्नातून विषबाधा