शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

वडीगोद्री परिसरात भगरीतून ३० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 19:21 IST

उपवासाला फराळ म्हणून शाबूदान्यासह भगरीच्या दशम्या, भगरीचा भात खाल्ला जातो.

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील सहा नागरिकांना भगरीतून विषबाधा ( food poisoning) झाल्यानंतर आता वडीगोद्री, भांबेरी या गावातील ३० जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाल्याने लोक उपवास धरतात. उपवासाला फराळ म्हणून शाबूदान्यासह भगरीच्या दशम्या, भगरीचा भात खाल्ला जातो. दोन दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटी येथे भगरीतून सातजणांना विषबाधा झाली. त्यानंतर आता वडीगोद्री, भांबेरी या गावांतही भगर खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मळमळ, उलट्या, अंगाचा थरकाप होणे, आदी त्रास या रुग्णांना होत आहे. यात वडीगोद्री येथील ज्ञानेश्वर भवर (वय ३३), पुष्पाबाई भवर (६०), सुनीता काळे (४०), मंदा काळे (६५), शिवकन्या काळे (३५), लक्ष्मीबाई शेळके (६५), संकेत काळे (१२), सुमित्रा काळे, राजेंद्र राठोड (३२), जनाबाई गावडे (४०), बाबूराव लिपणे (३०), राणूजी कोरटकर (५८), कोमल खटके (२८), तर भांबेरी येथील सुरेश केजभट, संगीता कनके, नंदा कनके, मीराबाई खरात, रेखा कनके, उषाबाई कनके, गयाबाई कनके, सुबिदर कनके, सीताबाई करमाळे, कमलबाई साळुंके, राधाकिशन कनके, सीताराम कनके, सूर्यभान कनके, जनाबाई कनके, मंगलबाई कनके, आदींचा समावेश असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची तब्बेत चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी सुट्टी भगर खाणे टाळावे, असे आवाहन अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पराग नरवाडे यांनी केले.

टॅग्स :Jalanaजालनाfood poisoningअन्नातून विषबाधा