शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

सुखद ! कोरोना काळातही जालना बाजार समितीच्या उलाढालीत ३०० कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 17:24 IST

जालन्यासह शेजारील विदर्भातूनही जालना बाजार समितीत माल विक्रीसाठी येत आहे.

ठळक मुद्देजालन्यातील बाजार समितीत सोयाबीनचे दर मध्यंतरी थेट सात हजार ४०० रुपयांवर पोहोचले होते, जे की विक्रमी मानले जातात. बाजार समितीच्या संचालक मंडळाने कोरोना काळातही स्वत: बाजारात येऊन अडचणींची सोडवणूक केल्याने उलाढाल वाढल्याचे सांगण्यात आले.

- संजय देशमुख

जालना : राज्यातील पहिल्या पाच बाजार समितीत मोडणाऱ्या जालना बाजार समितीने कोरोना काळातही उत्कृष्ट कामगिरी करीत उलाढाल वाढविली आहे. ही उलाढाल जवळपास ३०० कोटींनी वाढली असून, चालू आर्थिक वर्षात ही उलाढाल थेट ९०० कोटींवर पोहोचली आहे. यातून बाजार समितीस ११ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला आहे. जालना बाजार समिती ही राज्यात रोखीने व्यवहार करण्यासाठी प्रसिद्ध असून, येथील घाऊक व्यापारी हे भुसार मालाची आवक बाजार समितीत झाल्यास लगेचच त्यांचे पैसे अदा करत असल्याने येथे व्यवहाराला मोठे महत्त्व प्राप्त होते. जालन्यासह शेजारील विदर्भातूनही जालना बाजार समितीत माल विक्रीसाठी येत आहे. विशेष करून कोरोना काळात सर्वत्र भयावह चित्र असतानाही बाजार समितीचे सभापती तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी यासाठी जातीने लक्ष घालून शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना मोठी मदत केल्यानेच हे शक्य झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी सांगितले.

गेल्या आर्थिक वर्षात भुसार, शेती तसेच कृषी मालाची मोठी आवक झाली. त्यात विशेष करून सोयाबीन आणि कपाशीचा मोठा समावेश होता. जालन्यातील बाजार समितीत सोयाबीनचे दर मध्यंतरी थेट सात हजार ४०० रुपयांवर पोहोचले होते, जे की विक्रमी मानले जातात. कापूस खरेदीसाठीदेखील बाजार समितीचे सभापती खोतकर यांनी पणन महासंघाची मुदत संपल्यावरही शेततकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस शिल्लक होता. त्यासाठी जिनिंग मालकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी केला. तो साठवणुकीसाठी मोठमोठे पत्राचे शेड उभारून त्यात कापूस साठवून नंतर तो जिनिंगमध्ये गठाण तयार करण्यासाठी पाठविण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मध्यंतरी बाजार समितीचे जे शुल्क होते, ते मिळण्यास अडचणी येत होत्या. हे शुल्क रद्द केले होते. त्याला न्यायालयात आव्हान दिल्यावर त्यात बाजार समितीचे हक्काचे शुल्क हे राज्य सरकारने त्यांना दिलेच पाहिजे असे आदेश न्यायालयाने दिल्याने ते थकलेले ४० लाख रुपये देखील लवकरच प्राप्त होतील असेही इंगळे यांनी सांगितले. बाजार समितीच्या संचालक मंडळाने कोरोना काळातही स्वत: बाजारात येऊन अडचणींची सोडवणूक केल्याने उलाढाल वाढल्याचे सांगण्यात आले.

शेतकरी, व्यापाऱ्यांचे हित महत्त्वाचेबाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी यांना अडचण येऊ नये हा हेतू आहे. तसेच गेल्या दीड वर्षात कोरोनाचा कहर होता. अशाही स्थितीत शेतकऱ्यांनी घाम गाळून उत्पादित केलेल्या मालाची विक्री करताना त्यांना अडचण येऊ नये. तसेच व्यापाऱ्यांनाही या मालाची खरेदी करण्यासाठी मदत केली. या समन्वयामुळे जालना बाजार समितीची उलाढाल ही ९०० कोटींवर पोहोचली आहे. यातून बाजार समितीस ११ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला आहे. विविध बँकांकडून बाजार समितीने घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केल्याने बाजार समिती स्वयंपूर्ण झाली आहे.- अर्जुन खोतकर, सभापती, बाजार समिती जालना,

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरAgriculture Sectorशेती क्षेत्रJalanaजालना