शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

ग्रामीण भागातील खेळाडूंना ध्येय गाठण्यासाठी पालकांच्या पाठिंब्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST

अंबड : ग्रामीण भागातील मुलींना अडचणी खूप असतात, त्या अडचणींवर मात करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. पालकांनी मुलींना ...

अंबड : ग्रामीण भागातील मुलींना अडचणी खूप असतात, त्या अडचणींवर मात करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. पालकांनी मुलींना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन अर्जुन पुरस्कार विजेत्या तथा उरण येथील उपविभागीय अधिकारी ललिता बाबर - भोसले यांनी केले. अंबड येथे सुरू असलेल्या यशवंत व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. यावेळी संयोजक संजय खोरे, डॉ. गोपाल आडानी, डॉ. सविता जाधव, शिवाजी धुपे आदींची उपस्थिती होती.

बाबर म्हणाल्या की, मी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी असलेल्या बाबर वस्ती या छोट्याशा गावातून खेळाला सुरुवात केली. सातत्याने दुष्काळाचे चटके भोगत असलेल्या माण तालुक्यात आपला जन्म झाला. या दुष्काळी परिस्थितीमुळे आपल्याला मेहनतीने पुढे गेल्याशिवाय पर्याय नाही, हा विचार मनात आला आणि आज कष्टाने ऑलिंपिकपर्यंत पोहोचता आले. अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी सतत झगडत राहिले. अनेकदा विरोध झाला. पण, तरीही निर्धार ठाम असल्यामुळे मी थांबले नाही. आयुष्यात काहीतरी करायचं आहे, हा निर्धार होता. शाळेतील शिक्षक व घरच्यांनी पाठिंबा दिला म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळता आले. अडचणी खूप असतात. या अडचणींवर मात करून पुढे जाता येते. आपल्याला पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. आज या खेळामुळेच मला उपविभागीय अधिकारीपदापर्यंत पोहोचता आले, असेही त्या म्हणाल्या.

===Photopath===

220221\22jan_1_22022021_15.jpg

===Caption===

फोटोअंबड येथे आयोजित ऑनलाइन व्याख्यानात सहभागी  बोलताना ललिता बाबर व इतर मान्यवर दिसत आहे.