शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपण जोमात, संगोपन कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST

विजय बावस्कर वरूड बु : पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या संकल्पनेतून भंडारगड (ता. भोकरदन) ...

विजय बावस्कर

वरूड बु : पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या संकल्पनेतून भंडारगड (ता. भोकरदन) येथील टेकडीवर लोकसहभागातून एक हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. थाटामाटात झालेल्या वृक्षलागवड कार्यक्रमानंतर या रोपांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष झाले आहे. या भागात फिरणाऱ्या जनावरांमुळे रोपांचे नुकसान होत असून, लागवड केलेल्या रोपांपैकी किती रोपे जगणार, असाच प्रश्न निर्माण होत आहे.

पर्यावरणाच्या संगोपनासाठी वृक्षलागवड आणि संगोपन महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदाल यांनी विविध विभागांना वृक्षलागवड आणि संगोपनाचा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिंदाल यांच्या संकल्पनेनुसार भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत यांच्या पुढाकारातून जिंदाल यांच्या उपस्थितीत भंडारगड येथील उंच टेकडीवरील खड्डोबारायाच्या मंदिर परिसरात श्रमदानातून एक हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत या वृक्षलागवड मोहिमेत वरूड बु, मुर्तड, देहड तसेच परिसरातील लोकप्रतिनिधी, निसर्गप्रेमींनी भरभरून प्रतिसाद देत सहभाग नोंदविला होता. भरपावसात ही वृक्षांची लागवड मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर वृक्ष संगोपनाची प्रत्येकाने शपथदेखील घेतली होती.

थाटामाटात झालेल्या वृक्षलागवड मोहिमेनंतर या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नसल्याचे दिसत आहे. वृक्षलागवड करतेवेळी संगोपनाची घेतलेली शपथही अनेकजण विसरले आहेत. या परिसरात बकऱ्यांसह इतर जनावरे चराई करतात. जनावरांच्या या चराईत अनेक रोपांचे नुकसान झाले आहे. उर्वरित रोपेही बेवारस अवस्थेत पडले आहेत. वृक्षसंगोपन ही काळाची गरज आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ही रोपे जगवावीत, यासाठी विशेष मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.

कोट

तालुका प्रशासनाने चांगला उद्देश समोर ठेवून वृक्षलागवड केली आहे. परंतु, लागवडीनंतर ही रोपे बेवारस अवस्थेत पडली आहेत. अनेक रोपांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे वृक्षलागवडीचा उद्देश यशस्वी होण्यासाठी या रोपांचे संगोपन होणे गरजेचे असून, यासाठी प्रशासकीय विभागाने पुढाकार घेऊन लोकचळवळ उभी करावी.

दिलीप वाघ

फोटो