शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

बियाणाच्या टंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळी सोयाबीनची लागवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST

जालना : शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणांच्या टंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात सोयाबीनचे बीजोत्पादन घ्यावे, असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा ...

जालना : शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणांच्या टंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात सोयाबीनचे बीजोत्पादन घ्यावे, असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सोयाबीन पैदासकार डॉ. एस. पी. म्हेत्रे यांनी केले आहे.

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी विज्ञान मंडळाच्या २८१ व्या ऑनलाइन मासिक चर्चासत्रात ‘उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर म्हेत्रे बोलत होते. परभणी जिल्ह्यातील केहाळ येथील प्रयोगशील भुईमूग उत्पादक शेतकरी कृषिभूषण मधुकर घुगे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात सोनुने यांनी यंदाच्या खराब हवामानामुळे येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगून काही भागात पाण्याची उपलब्धता असल्यामुळे उन्हाळी भुईमूग लागवडीस वाव असल्याचे ते म्हणाले.

उन्हाळी सोयाबीन पेरणी करताना कृषी विद्यापीठाने विकसित केलेले जे. एस.-९३-०५, फुले संगम यासह इतर वाणांचा वापर करावा, असे सांगून एस.पी. म्हेत्रे म्हणाले, पेरणी ११ ते २० जानेवारीपर्यंत करावी. पेरणीपूर्वी थायरम किंवा ट्रायकोडर्मा ८ ते १० मि.लि. प्रतिकिलो व रायझोबियम आणि पी.एस.बी.- १०० मि.लि. प्रति १० किलो वापरून बीजप्रक्रिया करावी, यामुळे उत्पादनात वाढ होते. प्रतिएकरी २६ किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे, १५ ते २० दिवसांनंतर एक कोळपणी व खुरपणी करणे गरजेच असून, कमीत- कमी ६ ते ८ पाणी आवश्यक आहेत. खताची मात्रा ही ३० किलो नत्र, ६० किलो स्फूरद, ३० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावी. पांढरी माशी, तुडतुडे ही रस शोषणारी कीड, शेंगा पोखरणारी अळी अशा किडींच्या नियंत्रणासाठी प्रोफोनफोस किंवा सायपरमेथ्रीन २५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी हंगामात ५ ते ६ क्विंटल उत्पादन येऊ शकते, असेही डॉ. म्हेत्रे म्हणाले. याप्रसंगी रामदास वाघ, शंकर जाधव, रिता पाटील, नामदेव माथने, दिगंबर जाधव, लक्ष्मण उगले, सचिन कोरके, शंकर नागवे, विनोद कदम, अंकुश शिंदे, राहुल मानकर यांनी सोयाबीनसंदर्भातील शंकांचे निरसन केले.

चौकट

‘उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करताना कृषिभूषण मधुकरराव घुगे म्हणाले, उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. भाभा संशोधन संस्थेने विकसित केलेले टॅग-२४, टी टीजी-२६ अ, असे ९० ते ९५ टक्के उगवण क्षमता असलेले वाण वापरावे. भुईमूग उत्पादन हे एकरी झाडांची संख्या व त्याला लागणाऱ्या शेंगा यावर अवलंबून असते. या सर्व बाबींचा विचार करून एकरी ८० किलो बियाणे वापरल्यास उत्पादनात वाढ होते, असे ते म्हणाले. लागवडीसाठी दोन ओळींतील अंतर २५ सें.मी. व दोन झाडांतील अंतर १० सें.मी. ठेवावे. भुईमूग बीज प्रक्रियेसाठी बुरशी नाशकाचा वापर करावा, असे मधुकरराव घुगे म्हणाले. राहुल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.