शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

जालना-वडीगोद्री मार्गासाठी याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:15 IST

जालना-वडीगोद्री रस्त्याच्या दुरवस्थेविषयी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जालना-वडीगोद्री जनआंदोलन समितीने जनहित याचिका दाखल केली आहे

अंबड : जालना-वडीगोद्री रस्त्याच्या दुरवस्थेविषयी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जालना-वडीगोद्री जनआंदोलन समितीने जनहित याचिका दाखल केली आहे. या मार्गाच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातांत २८९ नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने याप्रश्नी आम्ही जनहित याचिका दाखल केली असल्याचे समितीचे संयोजक अ‍ॅड. किशोर राऊत यांनी सांगितले.जालना-वडीगोद्री हा रस्ता जालना जिल्ह्याला दक्षिणेकडील राज्यांशी जोडणारा प्रमुख रस्ता आहे. मात्र दुरवस्था पाहता याला राज्य महामार्ग कसे म्हणावे, असा प्रश्न पडतो. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात नित्याचेच झाले आहेत. अंबड व घनसावंगी या दोन्ही तालुक्यांना जालना, औरंगाबाद, बीड व इतर शहरांना जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, चौपदरीकरण करावे या मागणीसाठी आतापर्यंत दोन्ही तालुक्यांतील जनतेने अनेक आंदोलने केली. मात्र, शासन व प्रशासनाला अद्यापपर्यंत काहीही फरक पडलेला नाही.विशेष म्हणजे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दोन आठवड्यांपूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण होणार असल्याचे तालुक्यातील शहापूर येथे जाहीर केले. मात्र केवळ आठवडाभरातच सा. बां. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याचे नूतनीकरण नव्हे, तर सुदृढीकरण होणार असून त्यासाठी केवळ २५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. यामुळे जनतेच्या संशयकल्लोळात भर पडली आहे.विविध आंदोलनांनंतर कंटाळलेल्या जनआंदोलन समितीने या प्रश्नी जनहित याचिका दाखल केल्याने आता तरी या रस्त्याचे भाग्य उजळेल का, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहे.