शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

नागपूरमधील जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : केंद्र आणि राज्य सरकार शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सत्तेत ...

ठळक मुद्देसुरेशकुमार जेथलिया : हिवाळी अधिवेशनावर काँग्रेसचा मोर्चा, सरकारवर जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र आणि राज्य सरकार शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सत्तेत येऊन साडेतीन वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सरकारविरूद्ध १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काँग्रेस पक्षातर्फे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी गुरुवारी येथे केले.मोर्चाच्या पूर्वतयारी संदर्भात गुरुवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष विलासराव औताडे, माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, अनुसूचित जातीजमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय जºहाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.माजी आ. जेथलिया म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने सत्ता प्राप्तीनंतर खोटी आश्वासने देण्याशिवाय काहीच केले नाही. फसवी कर्जमाफी, शेतमालाचे पडलेले भाव, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आदी प्रश्नांवरून शेतकºयांसह सामान्य जनतेत सरकारविरूद्ध मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण आणि अन्य मान्यवरांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा मोर्चा यशस्वी होण्याच्या दृष्टीने आपसातील मतभेद आणि गटबाजी बाजुला ठेवून मोर्चा यशस्वीतेसाठी प्रयत्न करावा, असेही आवाहन त्यांनी केले.सरकारप्रती जनतेत असलेला आक्रोश आता भाजपापर्यंत पोहोचल्याने भाजपाचे नेते यशवंत सिन्हा आणि खा. नाना पटोले सारखी मंडळी शेतकºयांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करू लागली आहे. या सरकारचे दिवस भरत आल्याचे संकेत मिळू लागले असल्याचे औताडे म्हणाले. भीमराव डोंगरे, विमलताई आगलावे, विजय कामड, सत्संग मुंढे आदींनीही यावेळी सरकारच्या कारभारावर टीका केली. प्रास्ताविक शहराध्यक्ष अब्दुल हाफीज यांनी केले. खा. राजीव सातव, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र राख, शेख खलील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधाचा ठराव बैठकीत मांडला. या ठरावाला मुंढे यांनी अनुमोदन दिले. आभार प्रदर्शन सरचिटणीस राजेश काळे यांनी केले. बैठकीस एकबाल कुरेशी, सभापती दत्तात्रय बनसोडे, कृष्णा पडूळ, संतोष माधोवाले, प्रकाश नारायणकर, निळकंठ वायाळ, विठ्ठलसिंग राजपूत, शरद देशमुख, मोहन इंगळे, सय्यद मुसा, अ‍ॅड. विनायक चिटणीस, रऊफ परसूवाले, परमेश्वर गोते, ज्ञानेश्वर उगले, सुभाष ढाकणे, इब्राहिम कायमखानी, बाबा गाडगे, विष्णू चव्हाण, विष्णू कंटुले, देशमुख, मनोज जाधव, युवराज राठोड, लक्ष्मण शिंदे, आदींची उपस्थिती होती.