वरुड (बु.) : प्रभू नामात मोठी शक्ती असून, परमार्थ केल्यानेच माणसाच्या जीवनातील अवघड रस्ता सोपा होतो. त्यासाठी प्रत्येकाने दिवसभरात काळी वेळ तरी परमार्थ करावा, असे निरुपण ज्ञानेश्वर माउली महाराज शेलूदकर यांनी केले.
भोकरदन तालुक्यातील भंडारगड येथे गुरुवारी आयोजित कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. वरुड (बु.) येथील दिलीप वाघ यांच्या वतीने भंडारगड येथील उचं टेकडीवरील खंडोबा रायाच्या मंदिरासमोर गुरुवारी दुपारी हे कीर्तन झाले. आज विश्वास कुणावर ठेवावा हा मोठा प्रश्न आहे. कारण जगातील सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे मुखवट्या मागचे चेहरे ओळखणे होय. दुसऱ्याचा मोठेपणा व त्यांची प्रसिद्धी ही आपल्यातीलच काही लोकांना खूपत असल्यामुळे समाजातील लोंकाची दशा व हाल होत चालले आहेत.
या विश्वात संपत्तीला अनन्य साधारण महत्त्व दिले जात आहे. परंतु जगण्या- मरण्याचा हिशोब भंगवताकडे आहे. त्यासाठी आपण कितीही ही संपत्ती कमवली तरी ती काहीच कामाची नाही. कारण रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जावे लागणार आहे. त्यामुळे माणूस म्हणून जगा आणि आपल्याकडील पैसा-संपत्ती समाजकारणासाठीदेखील खर्च करा, गरजुंना मदत करुन अन्नदान करा, असेही ज्ञानेश्वर माउली महाराज शेलूदकर म्हणाले. शेलूदकर महाराजांनी विविध दाखले देत उपस्थतांचे प्रबोधन केले.
भाविकांना महाप्रसादाचे वाटप
मागील महिन्यापासून दर रविवारी अनेक भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जात आहे. गुरुवारी झालेल्या कीर्तन कार्यक्रमातही भाविकांना दिलीप वाघ यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
फोटो