शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

पंचनामे प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:05 IST

बोंडअळीमुळे जिल्ह्यातील दोन लाख ७९ हजार ५३९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून प्रगतिपथावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील दोन लाख ७९ हजार ५३९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत दोन लाख ४१ हजार शेतक-यांच्या एक लाख ५८ हजार ७४६ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.शेतकºयांसाठी नगदी पीक असलेल्या कपाशीचे यंदा बोंडअळीमुळे नुकसान झाले. पहिल्या व दुस-या वेचणीनंतर शेतात कापूसच राहिला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे यंदा मोठे नुकसान झाले आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईची मागणी जोर धरू लागल्यानंतर कृषी विभागाने शेतकºयांकडून सुरुवातीला ‘जी फॉर्म’ भरून घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाधित कपाशी क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश हिवाळी अधिवेशनात दिले. शेतक्यांना हेक्टरी सुमारे तीस हजारांची मदतही जाहीर केली. त्यानंतर मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कृषी व महसूल यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतात जाऊन बाधित कपाशी क्षेत्राचे पंचनामे केले जात आहे. यासाठी प्रथम मोबाईल अ‍ॅपचा वापर केला जात असून, बाधित कपाशी पिकाचा फोटो घेणे कृषीसेवक व तलाठ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्वच कपाशी क्षेत्र पूर्णत: बाधित झाल्यामुळे अपु-या कर्मचा-यांवर पंचनामे पूर्ण करताना कृषी व महसूल विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. गुरुवारअखेर जिल्ह्यातील एक लाख ५८ हजार ७४६ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित एक लाख २० हजार ७४६ हेक्टरवरील कपाशी क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुढच्या हंगामात कपाशीवर बोंडअळी होऊ नये याकरिता कपाशी पीक उपटून टाकण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, तब्बल सव्वा लाख हेक्टरवरील पंचनामे अपूर्ण असल्याने शेतकरी कपाशी ठेवावी की उपटून टाकावी या संभ्रमावस्थेत आहेत. घनसावंगी तालुक्यात कपाशी पीक उपटून ऊस लागवड केली आहे.