शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पंचनामे प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:05 IST

बोंडअळीमुळे जिल्ह्यातील दोन लाख ७९ हजार ५३९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून प्रगतिपथावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील दोन लाख ७९ हजार ५३९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत दोन लाख ४१ हजार शेतक-यांच्या एक लाख ५८ हजार ७४६ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.शेतकºयांसाठी नगदी पीक असलेल्या कपाशीचे यंदा बोंडअळीमुळे नुकसान झाले. पहिल्या व दुस-या वेचणीनंतर शेतात कापूसच राहिला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे यंदा मोठे नुकसान झाले आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईची मागणी जोर धरू लागल्यानंतर कृषी विभागाने शेतकºयांकडून सुरुवातीला ‘जी फॉर्म’ भरून घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाधित कपाशी क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश हिवाळी अधिवेशनात दिले. शेतक्यांना हेक्टरी सुमारे तीस हजारांची मदतही जाहीर केली. त्यानंतर मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कृषी व महसूल यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतात जाऊन बाधित कपाशी क्षेत्राचे पंचनामे केले जात आहे. यासाठी प्रथम मोबाईल अ‍ॅपचा वापर केला जात असून, बाधित कपाशी पिकाचा फोटो घेणे कृषीसेवक व तलाठ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्वच कपाशी क्षेत्र पूर्णत: बाधित झाल्यामुळे अपु-या कर्मचा-यांवर पंचनामे पूर्ण करताना कृषी व महसूल विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. गुरुवारअखेर जिल्ह्यातील एक लाख ५८ हजार ७४६ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित एक लाख २० हजार ७४६ हेक्टरवरील कपाशी क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुढच्या हंगामात कपाशीवर बोंडअळी होऊ नये याकरिता कपाशी पीक उपटून टाकण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, तब्बल सव्वा लाख हेक्टरवरील पंचनामे अपूर्ण असल्याने शेतकरी कपाशी ठेवावी की उपटून टाकावी या संभ्रमावस्थेत आहेत. घनसावंगी तालुक्यात कपाशी पीक उपटून ऊस लागवड केली आहे.