शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:05 IST

बोंडअळीमुळे जिल्ह्यातील दोन लाख ७९ हजार ५३९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून प्रगतिपथावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील दोन लाख ७९ हजार ५३९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत दोन लाख ४१ हजार शेतक-यांच्या एक लाख ५८ हजार ७४६ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.शेतकºयांसाठी नगदी पीक असलेल्या कपाशीचे यंदा बोंडअळीमुळे नुकसान झाले. पहिल्या व दुस-या वेचणीनंतर शेतात कापूसच राहिला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे यंदा मोठे नुकसान झाले आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईची मागणी जोर धरू लागल्यानंतर कृषी विभागाने शेतकºयांकडून सुरुवातीला ‘जी फॉर्म’ भरून घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाधित कपाशी क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश हिवाळी अधिवेशनात दिले. शेतक्यांना हेक्टरी सुमारे तीस हजारांची मदतही जाहीर केली. त्यानंतर मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कृषी व महसूल यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतात जाऊन बाधित कपाशी क्षेत्राचे पंचनामे केले जात आहे. यासाठी प्रथम मोबाईल अ‍ॅपचा वापर केला जात असून, बाधित कपाशी पिकाचा फोटो घेणे कृषीसेवक व तलाठ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्वच कपाशी क्षेत्र पूर्णत: बाधित झाल्यामुळे अपु-या कर्मचा-यांवर पंचनामे पूर्ण करताना कृषी व महसूल विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. गुरुवारअखेर जिल्ह्यातील एक लाख ५८ हजार ७४६ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित एक लाख २० हजार ७४६ हेक्टरवरील कपाशी क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुढच्या हंगामात कपाशीवर बोंडअळी होऊ नये याकरिता कपाशी पीक उपटून टाकण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, तब्बल सव्वा लाख हेक्टरवरील पंचनामे अपूर्ण असल्याने शेतकरी कपाशी ठेवावी की उपटून टाकावी या संभ्रमावस्थेत आहेत. घनसावंगी तालुक्यात कपाशी पीक उपटून ऊस लागवड केली आहे.