शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पान दोनचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST

अंबड : शहरासह ग्रामीण भागातील विजेचे वेळापत्रक कोलमडले आहे. दिवसरात्र वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त ...

अंबड : शहरासह ग्रामीण भागातील विजेचे वेळापत्रक कोलमडले आहे. दिवसरात्र वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याशिवाय ग्रामीण भागात रब्बीच्या गहू, हरभरा, ज्वारी या पिकांना विजेअभावी पाणी देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

विम्यासाठी उपोषण

तीर्थपुरी : पुणे येथील कृषी कार्यालयासमोर भोगगाव येथील शेतकरी सुधीर मुळे यांनी विमा कंपनीकडून कापूस व सोयाबीन या पिकाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सोमवारी उपोषण सुरू केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक यांनी ही निवेदन देण्यात आले होते.

लसीकरण मोहिमेअंतर्गत कार्यशाळा

मंठा : तालुक्यात कोविड आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहे. या दोन्ही मोहिमेच्या पूर्व तयारीबाबत ढोकसाळ येथील आरोग्य केंद्रात नुकतीच कार्यशाळा पार पडली. पोलिओ लसीकरण मोहिमेत १७ जानेवारील ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना डोस पाजण्यात येणार आहेत, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक लोणे यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. माधुरी बचाटे, आरोग्य सहाय्यक भारत गागुर्डे, सुजित वाघमारे हजर होते.

सुखापुरीत ४३१ जणांची नेत्र तपासणी

अंबड : तालुक्यातील सुखापुरी येथे नवदृष्टी अभियानांतर्गत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४३१ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६१ मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता निदान झाले. या सर्व व्यक्तींवर पुणे येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याप्रसंगी देसाई हॉस्पिटल डॉ. साठे. डॉ. यादव, डॉ. भोकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, पंचायत समिती उपसभापती रईस बागवान आदी उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी शिंदे

जालना : संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी बोलेगाव येथील महादेव तुकाराम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घनसावंगी येथे जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिंदे तसेच तालुका कार्याध्यक्षपदी अनंता शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. यावेळी बाळासाहेब बरसाले, महेश शिंदे, योगेश पवार, ज्ञानेश्वर शिंदे, सुखदेव काळे, त्वरित शिंदे, अविनाश भुतेकर, लक्ष्मण शिंदे आदींची उपस्थिती होती.

बारावी बोर्ड परीक्षा आवेदनपत्र प्रक्रिया

जालना : महाराष्ट्र राज्य माध्यमिक ‌ उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत शैक्षणिक वर्षाचे नियोजन यासह दहावी-बारावी बोर्ड परीक्षा नियोजन विस्कळीत झाले आहे. बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची धावपळ दिसून येत असल्याचे चित्र आहे.